महाशिवरात्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
शिव




महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.

`महाशिवरात्री' म्हणजे काय ? : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ? : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.

शिवपूजेची वैशिष्ट्ये : १शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय' हा नामजप जास्तीतजास्त करावा.

(अधिक माहितीसाठी वाचा : सनातन संस्था-निर्मित ग्रंथ `शिव')

संदर्भ : दैनिक सनातन प्रभातचा महाशिवरात्रि विशेषांक
http://www.hindujagruti.org/hinduism/festivals/mahashivratri/

ध्वनिचित्रपट

शिवविषयक आध्यात्मिक माहिती :


शृंगदर्शन कसे घ्यावे?


`महाशिवरात्री' अधिक ध्वनिचित्रपट व माहिती येथे पहा
Read more...

श्रीराम व मारुति

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्रीराम



श्रीरामनवमीआध्यात्मिक् महत्त्व : या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या तत्त्वाच्या व रामतत्त्वाच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात कार्यरत असल्याने जिवांना श्री दुर्गादेवी व श्रीराम या दोन्ही तत्त्वांचा फायदा होतो.

साजरी करण्याची पद्धत : राममंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीला दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, लहान मुलाचे टोपडे घातलेला नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात. त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. या दिवशी श्रीरामाचे कात केल्याने सर्व कातांचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते.

(संदर्भ - सनातन-निर्मित ग्रंथ `श्रीराम', `मारुति' व `सण, धार्मिक उत्सव व व्रते')

मारुति



हनुमान जयंतीचैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला, तो दिवस `हनुमान जयंती' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते व सर्वांना प्रसाद वाटतात.श्रीरामनवमी व हनुमान जयंती या दिवशी अनुक्रमे श्रीराम व हनुमान या देवतांचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण करण्यासाठी रामनवमीला `ॐ श्रीराम जय राम जय जय राम ।' असा व हनुमान जयंतीला `ॐ हं हनुमते नम: ।' असा नामजप जास्तीतजास्त करावा.

(संदर्भ - सनातन-निर्मित ग्रंथ `श्रीराम', `मारुति' व `सण, धार्मिक उत्सव व व्रते')

संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/san/san.shtml#ramnavmi

Read more...

श्री गणेश चतुर्थी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेश चतुर्थी

महत्त्व : दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो.

गणेश चतुर्थीचे कात कुटुंबात कोणी करावे ? : सर्व भाऊ एकत्र रहात असतील, म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांनी मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशकात करावे

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणाऱ्या गणेश लहरी नेहमीच्या पूजेतील मूर्तीत आवाहन केल्यास तिच्यात जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजा वर्षभर करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील सगळी बंधने पाळावी लागतात. म्हणून नवीन मूर्ती आवाहन करण्यासाठी वापरतात व नंतर विसर्जित करतात.

गणेशाला दूर्वा वहाण्याची पद्धत : कोवळया व ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असलेल्या दूर्वा एकत्र बांधून व पाण्यात भिजवून मग वहाव्यात. दूर्वा वहातांना चेहरा सोडून संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवावी. यामुळे मूर्ती लवकर जागृत व्हायला मदत होते.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशाचा नामजप करण्याचे महत्त्व : या काळात `ॐ गँ गणपतये नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त करावा. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशतत्त्वाचा आपल्याला जास्त लाभ मिळतो.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातन-निर्मित ग्रंथ `गणपति' )
संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/san/san.shtml#ganesh

गणपतिची स्थापना कशी करावी ?
Read more...