दत्तजयंती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. त्या वेळी देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न अयशस्वी झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात.

दत्तजयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत होत असतो.

दत्ताचा नामजप : श्री गुरुदेव दत्त ।

फायदे
१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्‍ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्‍तींशी लढू शकतो.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्‍ती मिळते.
३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्‍तींचा त्रास अल्प होतो.
४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, २.११.२००५, रात्री ८.३०)

लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे
१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्‍या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्‍तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.
४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.
५. नामजप करणार्‍या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. (३०.९.२००६, दुपारी २.०७)

पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना

दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व !

विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्‍नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.

समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना

समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्‍यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्‍त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्‍ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्‍त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.

त्याची शक्‍ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्‍त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्‍त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्‍तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात - ब्रह्मतत्त्व (२४.४.२००६ सकाळी ७.३५)

'दत्त'विषयक - आध्यात्मिक माहिती

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/dattajayanti/index.htm

Read more...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत : विठ्ठल

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


तत्त्व
श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य
श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.

तुमच्यातील `भक्‍तीभाव' हा घटक वाढण्यासाठी माझे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, असे श्री विठ्ठलाने सांगणे :
साधकांनो, ईश्‍वरीराज्य आणण्यासाठी तुमच्यात भक्‍तीभाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. जेवढा तुमचा भक्‍तीभाव जास्त, तितक्या लवकर ईश्‍वरी राज्य येईल. त्यामुळे तुमच्यातील `भक्‍तीभाव' हा घटक वाढण्यासाठी माझे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मी साधकांच्या मदतीला सतत धावून येईन.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्‍नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.

भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता
श्री विठ्ठल भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्‍तगण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात.
श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्‍तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्‍तांचा ठाम विश्‍वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्‍तांची दळणे दळली, गोवर्‍या थापल्या व भक्‍ताची सेवा केली.

मूर्तीविज्ञान
काळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.




२. विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती !

विठ्ठल
अ. व्युत्पत्ति : `विठ्ठल शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. कै. राजवाड्यांच्या मते `विष्ठल' शब्दावरून विठ्ठल हे रूप तयार झाले. विष्ठल म्हणजे दूर, रानातील जागा किंवा स्थळ होय. यावरून विठ्ठलदेव म्हणजे रानात असणारा देव, असा त्याचा अर्थ होतो. डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, विष्णु या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप बिट्टी होते आणि या अपभ्रंशापासून विठ्ठल शब्द तयार झाला. विष्णूचा विठ्ठु असा अपभ्रंश आर्य-प्राकृत भाषांच्या नियमानुसार होतो. श्री. चि.वि. वैद्यांचेही असेच मत आहे. कै. विष्णुबुवा जोग यांना `वीचा केला ठोबा' या तुकारामाच्या अभंगाच्या आधारे सांगितलेली व्युत्पत्ति अशी - वि विद् म्हणजे जाणणे किंवा ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती, म्हणून विठोबा म्हणजे ज्ञानमर्ती.

आ. दुसरे नाव : पांडुरंग. विठोबाला पांडुरंग असेही म्हणतात. हे नाव त्याला कसे मिळाले, ते सांगता येत नाही; कारण पांडुरंग हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते पंढरपूर होय, असे डॉ. भांडारकर म्हणतात.' विठ्ठलाची मूर्ती काळया रंगाची असूनही त्याला पांडुरंग (पांढर्‍या रंगाचा) हे नाव कसे, असा काही जणांना प्रश्‍न पडतो. वर दिलेल्या मुद्याखेरीज त्याचे उत्तर असे की, खर्‍या भक्‍ताला सूक्ष्मदर्शनेंद्रियाने ती मूर्ति पांढरीच दिसते. महिन्यातील दोन एकादशांपैकी पहिली विठ्ठलाच्या नावे व दुसरी पांडुरंगाच्या नावे करतात.

विष्णु : व्युत्पत्ती व अर्थ `विष् सतत क्रियाशील असणे, विश् व्यापणे यावरून यास्काने या शब्दावरूनही तो शब्द सिद्ध होतो, असा पर्याय दिला आहे (निरुक्‍त १२.१९).
इतर नावे : विष्णूचे `विष्णुसहस्रनाम' हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. या हजार नामांचा उच्चार करून विष्णूला तुलसीदले किंवा कमळे अर्पण करतात. सर्व नावे विष्णूचीच असली, तरी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात, या नियमानुसार विष्णूच्या या निरनिराळया नावांतून निरनिराळया प्रकारच्या शक्‍ती कार्यरत होतात. एका स्तोत्रपंक्‍तीत म्हटले आहे की, औषध घेतांना विष्णूचे स्मरण करावे. जेवतांना जनार्दनाचे, झोपतांना पद्मनाभाचे, लग्नाच्या वेळी प्रजापतीचे, युद्धाच्या वेळी चक्रधराचे, प्रवासात त्रिविक्रमाचे, मृत्यूच्या वेळी नारायणाचे, वाईट स्वप्न पडल्यास गोविंदाचे, संकटामध्ये मधुसूदनाचे, अरण्यामध्ये नारसिंहाचे स्मरण करावे.

इ. पत्‍नी (शक्‍ती) : देवांच्या पत्‍नी म्हणजे त्यांच्या शक्‍ती होत. या तारक व मारक अशा दोन प्रकारच्या असतात. विठ्ठल हा उत्पत्ती, स्थिती व लय यांपैकी स्थितीचा देव असल्याने त्याच्या दोन्ही शक्‍ती, म्हणजे पत्‍नी, उत्पत्ति व स्थितीशी संबंधित आहेत. राई व रुक्मिणी ह्या विठ्ठलाच्या पत्‍नी होत.
इ १. राई : राई म्हणजे मातीचा कण. तो पृथ्वीच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. (शिरीष म्हणजे राईला आलेले फूल.) राईलाच पद्मावती किंवा पदुबाई म्हणतात. पद्मकोश म्हणजे गर्भाशय.
इ २. रुक्मिणी (रखुमाई) : रुक्मिणी म्हणजे वारूळ किंवा शंखाचा आकार. हेही गर्भाशयाचे प्रतीक असते.

ई. आषाढी एकादशी : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) व वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधि करतात.

उ. पंढरपुरची वारी : हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असे समजले जाते.
(संदर्भ : सनातनतर्फे प्रकाशित ग्रंथ : विष्णु व विष्णूची रूपे)

Read more...

बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

अनुक्रमणिका



१. बलिप्रतिपदा



अ. कथा :
हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिप्रदेची कथा अशी - बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथि जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये; पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ति गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान. मुंजा मुलगा लहान असतो व तो `ॐ भवति भिक्षां देही ।' म्हणजे `भिक्षा द्या' असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ``काय हवे ?'' तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार, याचे ज्ञान नसल्याने बलिराजाने त्रिपाद भूमि या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले. तिसरा पाय आपल्या मस्तकावर ठेवा असे बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने ``तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)'', असे बलिराजास सांगितले. तेव्हा `आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे', असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते; मात्र शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून. अभक्ष्यभक्षण, अपेयपान व अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात) पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशी ही दिवाळी. बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बलि व त्याची पत्‍नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा व फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात.

आ. विक्रम संवत् वर्षारंभ दिन



२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये

अ. हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वत:च्या अंत:करणाचे निरीक्षण करा.

आ. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात.

इ. या दिवशी बर्‍याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.

ई. या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु व सत्यनारायण यांच्या) भक्‍तांना जास्तीतजास्त फायदा होतो.)

साधकांनो, या दिवशी माझे तत्त्व जास्तीतजास्त येणार असल्याने तुमच्यातील तळमळ व भक्‍ती वाढवून त्याचा फायदा करून घ्या.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १०.१०.२००५, सकाळी ११.१३)


३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती



हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त म्हणून ओळखला जातो. या दिवशी बलीची पूजा सर्वप्रथम का करावी, तसेच कालचक्राबाबत सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांना एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती येथे देत आहोत.

अ. पाताळातून येणार्‍या लहरी बलीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे बलीची पूजा सर्वप्रथम करावी !
पाताळातून येणार्‍या सर्व लहरी बलीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे लहरींवर नियंत्रण असलेल्या घटकाचीच सर्वप्रथम पूजा केल्यास भोगाने तृप्‍त झालेला घटक अन्य घटकांना नियंत्रित करून ठेवतो. तसेच एक-एक करून तो सर्वच घटकांना भोग पुरवतो; म्हणून सर्वप्रथम बलीची पूजा करण्याचे शास्त्र (विधान) आहे.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी १.०४)

आ. बलिप्रतिपदेचा दिवस साडेतीन मुहूर्तांमध्ये गणला जाण्यामागील कारण
१. मुहूर्त : ज्या दिवशी गतीमान कालचक्रातील व्यासकता संपूर्णतेला, म्हणजेच प्रत्यक्ष उत्पत्ती बिंदूच्या व्यासत्वावर असलेल्या अवस्थेत उत्पत्ती बिंदूच्या संपर्कात येऊन पुन: व्यासत्वाच्या स्वरूपात गतीमान होण्यास सुरुवात होते, त्या काळाला, म्हणजेच प्रत्यक्ष काळाच्या नूतनतेच्या वेळी कार्यरत झालेल्या गतीमततेतील व्यासत्वातून कार्यरत होणार्‍या दिवसाला `मुहूर्त' असे म्हटले जाते.
२. महाकालचक्रातील तत्त्वाचे व ईश्‍वरी शक्‍तीचा लाभ होऊन भूत आणि भविष्य यांचा योग्य तो समतोल राखण्यासाठी साडेतीन मुहूर्त साजरे केले जाणे :
इच्छा, क्रिया, ज्ञान आणि धर्म या प्रकारच्या चार घटकांच्या निमित्ताने साडेतीन मुहूर्त साजरे केले जातात. मुहूर्त ही संकल्पना प्रत्यक्ष कालचक्राच्या अनुषंगाने आहे. कालचक्र म्हणजे ईश्‍वराने निर्मिलेल्या सृष्टीच्या संहारकतेकडे होत असलेल्या प्रवासाची प्रत्यक्ष गती स्वरूपातील गणना. साडेतीन मुहूर्तातील पहिला मुहूर्त हा कालचक्राच्या इच्छा स्वरूपातील पूर्णतेचा, दुसरा मुहूर्त क्रिया स्वरूपाच्या पूर्ततेचा, तिसरा मुहूर्त ज्ञान स्वरूपाच्या पूर्ततेचा, तर अर्धा मुहूर्त धर्माच्या अर्ध पूर्णतेतून लयाकडे होत असलेल्या समावेशकतेचा दर्शक आहे. ज्या दिवशी महाकालचक्राच्या एक एक अंगाची पूर्णत्वता एक एक बिंदूशी निगडित होते, त्या दिवशी त्या त्या तत्त्वाचे बाहुल्य असते. कालाच्या प्रत्येक उपखंडाच्या त्या त्या उपखंडात त्या त्या दिवशी ईश्‍वराची ती ती शक्‍ती कार्यरत होत असल्यामुळे त्या त्या शक्‍तीचा लाभ होऊन भूत आणि भविष्य यांचा योग्य तो समतोल राहून जीवस्थिती स्वरूपात, म्हणजेच वर्तमानकाळात राहून त्या त्या तत्त्वाचा प्रत्यक्ष लाभ व्हावा; म्हणून साडेतीन मुहूर्त साजरे केले जातात.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी १.५२)
३. इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती यांच्या बलावर प्राप्‍त झालेल्या कालाला पूर्णकता कालचक्राच्या व्यासाला पूर्णत्वातून उच्चपूर्णत्वाकडे नेते; म्हणून तीन मुहूर्त हे पूर्ण दिवसाचे गणले जातात, तर धर्मशक्‍ती ही परिपूर्णत्व वाचकसंज्ञेतून अपूर्णत्व वाचकतेशी निगडित संज्ञेकडे, म्हणजेच ईश्‍वराकडे कालाच्या व्यासाला नेत असल्यामुळे त्या दिवसाला अर्धा म्हणून साजरा केला जातो.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.०७)

इ. कालचक्राचा प्रवास
श्री. निषाद देशमुख : इच्छाशक्‍तीतून कालचक्राचा प्रवास सुरू होऊन तो क्रियाशक्‍तीद्वारे पूर्णत्वाला गेला, क्रियाशक्‍तीतून सुरू झालेला कालचक्राचा प्रवास ज्ञानशक्‍तीतून पूर्णत्वाकडे गेला व ज्ञानशक्‍तीतून सुरू झालेला कालचक्राचा प्रवास धर्मशक्‍तीतून पूर्णतेकडे गेला, असे आहे का ?
एक ज्ञानी : नाही.
१. सत्ययुगाची सुरुवात : ईश्‍वराच्या इच्छाशक्‍तीने संकल्पशक्‍तीचे सगुण कार्यजन्यात्मक स्वरूप धरून सृष्टीउत्पत्ती ईश्‍वराच्या निर्गुणात्मक सगुण इच्छाशक्‍तीच्या प्रत्यक्ष प्रभावलयतेच्या आधारभूतात्मकतेच्या वर गेली व सत्ययुगाची सुरुवात झाली.
२. त्रेतायुगाची सुरुवात : पुढे सगुणातून कार्यरत झालेल्या इच्छाशक्‍तीने सगुण-निर्गुण, निर्गुण-सगुण, निर्गुण आणि निर्गुणातीत रूपाच्या एकानंतर एक, अशा श्रेष्ठतम स्तरावर त्या त्या स्तरावरच्या स्वरूपात्मक बोधतेतील कार्यजन्यता घेऊन निर्गुणात्मकता, म्हणजेच शून्यकतेवर आधारित असलेल्या निर्गुणजन्यात्मकतेप्रमाणे सगुणात्मक चालनात्मकतेशी निगडित स्तरावर सत्ययुगाची पूर्णता करून प्रभावलयतेच्या स्वरूपात क्रियाशक्‍तीच्या निर्गुणावर आधारलेले स्वरूप घेऊन त्रेतायुगाची सुरुवात झाली.
३. द्वापारयुगाची सुरुवात : त्यानंतर शक्‍तीतील त्या त्या उच्चकता कालाच्या प्रवाहमानकतेच्या आधारे घेऊन ज्ञानशक्‍तीच्या स्वरूपात द्वापारयुगाची सुरुवात झाली.
४. कलीयुगाची सुरुवात : त्यानंतर धर्मशक्‍तीच्या स्वरूपात कलीयुगाची सुरुवात केली.
(श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.२१)

इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती या पूर्णत्वाशी, तर धर्मशक्‍ती अपूर्णत्वाशी संबंधित असणे : प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती या पूर्णत्वाशी, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या प्रकारच्या पूर्णत्वाशी निगडित प्रत्यक्ष उपात्मक (म्हणजेच उप-उप स्वरूपावर त्या त्या स्तराला धरून कार्य करणारी) स्वरूपाचे कार्य करण्यासही सक्षम असल्याने त्या त्या स्वरूपात कार्य करून प्रत्यक्ष कालाला पूर्णत्वाची परिपूर्णता प्रदत्त केली. याउलट धर्माची अपूर्णात्मकता (अपूर्ण म्हणजेच ज्याला पूर्णत्वाने व्यापू शकत नाही, अशा ईश्‍वरापासून निर्मिती झालेली असल्यामुळे) हाच गुणधर्म असल्यामुळे धर्मशक्‍तीच्या बलावर कलीयुगाची समाप्‍ती होऊन पूर्ण कालचक्र ईश्‍वरात विलीन होईल. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.२१)

ई. कलीयुगाच्या समाप्‍तीच्या दिवस बलिप्रतिपदा असेल : सध्याच्या सत्ययुगातून कलीयुगापर्यंतच्या समाप्‍तीचा दिवस बलिप्रतिपदा, म्हणजेच धर्मशक्‍तीच्या स्वरूपातून निर्गुणकतेकडे नेणारा दिवस असेल. या दिवशी श्रीविष्णूचा दहावा अवतार कल्की आसुरी शक्‍तीचा शेवट करून पूर्ण सृष्टीला ईश्‍वरात विलीन करील.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६ दुपारी २.२१)

उ. धर्मपालनामुळे ईश्‍वराच्या क्रियास्वरूपात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण होऊन ईश्‍वर जिवाला उच्च स्थानावर नेतो !विश्‍वाच्या स्थितीधारकतेसाठी कार्यरत होणार्‍या प्रत्यक्ष मानवबलामध्ये ईश्‍वरी शक्‍तीची जागृती होऊन कर्माच्या फलनिष्पतीत जिवाला प्रत्यक्ष ईश्‍वराशी सहज स्तरावर एकरूपता गाठता यावी, यासाठी बुद्धीगम्य कर्माच्या माध्यमातून बुद्धीअगम्य कार्य करणार्‍या स्थूल घटकाशी निगडित विधींचा समावेश केला आहे. धर्म स्वत:च्या प्रत्यक्ष कर्मस्वरूपमय वलयातून ईश्‍वराच्या क्रियास्वरूपात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण करून प्रत्यक्ष मानवाची जागृती आणि विश्‍वाच्या स्थितीतील प्रत्यक्ष ईश्‍वरी ऊर्जेचे माध्यमदर्शक प्रक्षेपण ही दोन्ही कर्मे जिवात करून जिवाला उच्च स्तरावर नेतो; म्हणून हिंदु धर्मामध्ये धर्मपालनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात आले आहे.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६ दुपारी ९.३४)


४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !

`विष्णूने अनन्य भक्‍त असुराधिपती बलीवर अन्याय केला. असा कसा तो परमात्मा विष्णु ? त्याला करुणामय कसे म्हणावे ? बलीने अश्‍वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्‍त झाले. देव व ऋषी यांनी त्या यज्ञाची विलक्षण प्रशंसा केली; पण बली हा भोगार्थी नाही, तर मोक्षार्थी आहे, असा निर्णय करून त्याचे इष्ट करण्याकरिता सिद्धी देणारा विष्णु (बटुवामन) त्याच्या यज्ञात आला आणि केवळ भोगाकरिता दीन झालेल्या व त्यामुळे अथवा असे करण्यास योग्य असलेल्या वडील बंधू इंद्राला जगताचा तुकडा देण्याच्या उद्देशाने, बलीला बाह्यदृष्ट्या फसवून; पण अंतरदृष्ट्या त्याचे कोटीकल्याण करून, त्या पापहारक हरीने, मायाबलाने तीन पावलांनी तिन्ही भुवने त्याच्यापासून हिरावून घेतली व त्याला पाताळातले राज्य दिले; पण बलीचे प्रारब्ध त्याला इंद्रत्व देणार आहे. तो त्याकरिता शरीर धारण करून जीवन्मुक्‍त स्थितीत आहे.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


५. ।। मंगलाचरण ।।

`आपले कल्याण असो !'

`आपले स्वागत आहे !!'

`मी याचक आहे.'

`प्रभू ! मी आपली काय सेवा करू ?'

`मला जमीन हवी !'

`किती ?'

`माझ्या पावलाने, ...तीन पावले !'

`दिली !!'

`संकल्प जल हातावर द्या !'

शुक्राचार्य सांगतात, `बलीराजा देऊ नको !...याचक भिक्षुक नाही, साक्षात् `विष्णु' आहे.'

बली म्हणाले, `साक्षात विष्णूपेक्षा श्रेष्ठ असा दान देण्याला पात्र कोण असू शकतो ?'

अशा प्रकारे राजा बलीच्या यज्ञारंभी पूजीत झालेला वामन भगवंत आम्हा सर्वांचे नेहमी रक्षण करो !!

(श्रीमहाविष्णूचा पाचवा वामन अवतार, पृ. ३ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ))

Read more...

भाऊबीज (यमद्वितीया)(कार्तिक शुद्ध द्वितीया)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अनुक्रमणिका



१. कथा व विधी

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे.


या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपमृत्यु येत नाही. अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते')


२. बहीण नसलेल्या भावाने अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यामागील शास्त्र

यमलहरींना प्रत्यक्ष संचारण्यासाठी बल देणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्य असल्यामुळे शास्त्रात बहीण नसलेल्या भावालाही अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यासाठी सांगितलेले असणे

धर्मात सांगण्यात आलेले कर्तव्य हे जिवाच्या व्यष्टी, तसेच समाजाच्या समष्टी या दोन्ही घटकांना प्रत्यक्ष ऊर्जाबल पुरवून त्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करत असल्यामुळे धर्मात सांगण्यात आलेले कर्म करणे, हे प्रत्येक जिवाचे कर्तव्य ठरते. यमलहरींना प्रत्यक्ष संचार करण्यासाठी बल देणे, म्हणजेच प्रत्यक्ष सृष्टीकर्मात ईश्‍वराने ठरवलेले आपले कर्तव्य पार पडणे असल्यामुळे `भाऊबिजेच्या दिवशी बहीण नसलेल्या भावानेही अन्य स्त्रीला बहीण समजून तिच्या घरी जेवण्यासाठी जावे', असे धर्माने सांगितले आहे. बहीण नसलेल्या पुरुषाद्वारे अन्य स्त्रीला बहीण मानून तिच्या घरी जाऊन भोजन करणे म्हणजेच `मनुष्याने धर्मासाठी आपले पूर्ण कर्तव्य पार पाडणे', असे म्हटले जाते. अशा प्रकारे धर्मासाठी पूर्ण प्राणपणाने कर्म करणार्‍या जिवाची उन्नती लवकर होते.
- (श्री. निषाद देशमुख यांना चिंतनाच्या माध्यमातून मिळालेली माहिती, १२.१०.२००६, सकाळी ११.३६)


३. यमलहरींना प्रत्यक्ष ऊर्जाबलता न पुरवल्यास जिवाला होणारे तोटे

अ. प्रत्यक्ष संचार करणार्‍या यमलहरींना पुढे नेणारे क्रियाबल न पुरवल्यामुळे जिवाचा लिंगदेह खूप काळासाठी अडकलेल्या अवस्थेत भुवलोक किंवा अन्य योनी यांत रहातो.
आ. जिवावर यमदेव रुष्ट झाल्यामुळे त्याच्या प्रकोपस्वरूपी प्रत्यक्ष मृत्यूलहरींचे प्रक्षेपण जिवाच्या कालचक्रावर झाल्यामुळे त्याला अकालमृत्यूचा अंगीकार करावा लागतो किंवा त्याला सतत लयदर्शकात्मक घटनांचा सामना करावा लागतो.
इ. जिवाच्या देहात प्रत्यक्ष भोगासाठी आकृष्ट झालेल्या लहरींची तृप्‍तता न झाल्यामुळे त्या लहरींच्या विघटनजन्य प्रक्षेपणामुळे त्याच्या शरीरात विविध ठिकाणी दाब निर्माण होऊन त्याला शरीरात विविध ठिकाणी दुखणे, हृदयविकार होणे, तो बेशुद्ध पडणे, अशा प्रकाराचे त्रास होतात.
ई. जिवाद्वारे प्रत्यक्ष धर्मस्वरूपाची व ईश्‍वरवाचक संज्ञेची अवज्ञा झाल्यामुळे त्याला धर्मदंड भोगावा लागतो.
उ. जिवाने सृष्टीच्या संचालनासाठी सहकार्य न केल्यामुळे त्याला समष्टी पाप भोगावे लागते.
ऊ. भाऊबिजेसारख्या सणाच्या माध्यमातून जिवाला समाजऋण व देवऋण फेडता येते. याउलट भाऊबीज साजरी न केल्यास जिवाला समाजऋण व देवऋण फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.१०.२००६, सकाळी ११.४९)


४. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण, धार्मिक कृती आदींच्या माध्यमातून जिवाला सर्व प्रकारचे ऋण फेडणे शक्य होणे

भारतीय संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेले विविध सण, विधी आदींच्या माध्यमातून जिवावर असलेले देव, पितर, समाज आणि ऋषी ऋण फेडले जातात. साधना न करणार्‍या जिवालापण हे सर्व ऋण फेडणे शक्य व्हावे; म्हणून विविध कालखंडांत विविध प्रकाराच्या धार्मिक कृती, सण, धार्मिक विधी साजरे करण्याचे नियम घातले गेले आहेत. - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.१०.२००६, सकाळी ११.५४)



Read more...

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

अभ्यंगस्नानाचे परिणाम दर्शवणारे चित्र





कृती : व्यक्‍तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवावी.

इतर सूत्रे
१. प्रथम शरिराला तेल लावल्यामुळे त्वचेतील रंध्रांतून शक्‍तीचे कण देहात पसरतात.
२. देहाला तेलमिश्रीत उटणे लावल्यामुळे देहात शक्‍तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होतात, तर अभ्यंगस्नान करतांना चैतन्याची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होतात आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
३. नेहमीच्या आंघोळीपेक्षा नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने ५ टक्के अधिक लाभ होतो आणि वरील स्पंदने अधिक काळ देहात टिकून रहातात.
http://www.sanatan.org/mr/a/cid_144.html
Read more...

नवरात्र विशेष : देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नवरात्र विशेष

आश्‍विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त आज देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन केल्यामुळे होणारा परिणाम यांविषयी जाणून घेऊया.



देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व
देवीपूजनाची सांगता खण अन् साडी देवीला अर्पण करून करावी. देवीला साडी अर्पण करतांना ती सुती किंवा रेशमी असावी. या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी ठेवून त्यावर खण आणि त्यावर नारळाची शेंडी देवीकडे ठेवून देवीला चैतन्य देण्याविषयी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भावपूर्ण प्रार्थना करून सगुण देवीतत्त्व जागृत करावे आणि खण-नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर देवतेच्या चरणांवरील वस्त्र देवतेचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळाचाही प्रसाद म्हणून उपयोग करावा.

महत्त्व
अ. नारळ : नारळाच्या शेंडीकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट होते आणि ते खण अन् साडी यांमध्ये संक्रमित होण्यास मदत होते. नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षण कवच निर्माण होते.

आ. वस्त्र : वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरी या नारळातून आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे गतिमान बनतात व या लहरींचे जिवाच्या देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होण्यास मदत होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शक्‍ती')

कुमारिका-पूजन केल्यामुळे होणारा परिणाम
सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
ईश्‍वरी तत्त्व : १.२५
चैतन्य :
शक्‍ती (अप्रकट) :

१. `यजमान पत्‍नीसह कुमारिकेचे पूजन करतात, त्या वेळी त्यांनी `प्रत्यक्ष देवीचेच पूजन करत आहोत', असा भाव ठेवल्याने त्यांच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होते.

२. यजमानांनी भावपूर्ण पूजन केल्यामुळे कुमारिकेमध्ये ईश्‍वरी तत्त्व आकृष्ट होते.

२ अ. ईश्‍वरी तत्त्वाचे वलय कुमारिकेमध्ये निर्माण होते.

चैतन्य
३. चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होतो.
३ अ. चैतन्याचे वलय कार्यरत स्वरूपात फिरते.
३ आ. चैतन्याच्या कणांचे वातावरणात प्रक्षेपण होते.

शक्‍ती
नवरात्रीमध्ये श्री दुर्गादेवीच्या पूजनानंतर कुमारिकेचे पूजन केले जाते.
४. देवीतत्त्वाच्या अप्रकट शक्‍तीचा प्रवाह कुमारिकेकडे आकृष्ट होतो.
४ अ. अप्रकट शक्‍तीचे वलय निर्माण होते.
४ आ. या वलयातून शक्‍तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण पूजन करणारे यजमान आणि पत्‍नी यांच्याकडे होते.
४ इ. अप्रकट शक्‍तीचे वलय यजमान पती आणि पत्‍नी यांच्यामध्ये निर्माण होते.
४ ई. कुमारिकेकडून शक्‍तीचे कण वातावरणात, तसेच यजमान आणि त्यांची पत्‍नी यांच्या देहात पसरतात.

इतर सूत्रे
१. कुमारिकेत मनावरील संस्कार आणि अहं यांचे प्रमाण न्यून असल्यामुळे ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवले.

२. सवाषिणीच्या पूजनातून प्रकट शक्‍तीचे प्रक्षेपण होते आणि कुमारिकेच्या पूजनातून अप्रकट शक्‍तीचे पूजन होते. त्यामुळे सवाषिणीच्या पूजनातून शक्‍तीच्या प्रक्षेपणाचे कार्य कुमारिकेकडून प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीपेक्षा अधिक असते.

३. कुमारिकेच्या पूजनातून आनंदाची स्पंदने अधिक प्रमाणात जाणवतात.

४. त्यानंतर कुमारिकेला सौंदर्यप्रसाधने (पावडर, फणी, कुंकू, आरसा इत्यादी.), दूध, वस्त्र, फळे आणि द्रव्य देऊन तिचे पूजन केले जाते.



हे देवीच्या तारक रूपाची भक्‍ती केल्याप्रमाणे असल्याचे जाणवले.'- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (भाद्रपद कृ. नवमी, कलियुग वर्ष ५१११ (१३.९.२००९)

Read more...

नवरात्र विशेष : घटस्थापना, वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नवरात्र विशेष

आश्‍विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त घटस्थापना, वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया.



घटस्थापना
घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १२.९.२००५, दुपारी ४)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शक्‍ती')

घटस्थापना : वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे
सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
ईश्‍वरी तत्त्व :

आनंद : ०.७५
चैतन्य :
शक्‍ती :
कृती : `चाळलेल्या मातीची वेदी सिद्ध करण्यात येते. या भूमीला प्रार्थना करण्यात येते. वेदीच्या मध्यभागी जव घालण्यात येतात आणि त्यावर कलश ठेवण्यात येतो. त्यात जल, दूर्वा, गंध घालून मग पंचपल्लव घालतात. (वड, पिंपळ, आंबा, जांभूळ आणि औदुंबर यांची पाने ठेवतात.) थोडी माती, सुपार्‍या, पंचरत्‍ने (सोने, हिरा, पाचू, नीलमणी आणि मोती), चांदीचे नाणे कलशात घालतात. कलशाच्या कंठाला दोरा गुंडाळतात. त्यावर ताम्हनात तांदूळ ठेवून कलशात वरुणदेवाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर माती पसरतात. त्यावर अंकुरणारी धान्ये पसरण्यात येतात. जव, तांदूळ, दोन प्रकारच्या चवळी, दोन प्रकारचे वाटाणे आणि मूग पेरतात. त्यावर पर्जन्यस्वरूप पाण्याचा वर्षाव करतात. धान्याला प्रार्थना करतात. त्यानंतर कलशाचे पूजन आणि प्रार्थना करतात.

१. चाळलेल्या मातीपासून सिद्ध करण्यात आलेल्या वेदीला, म्हणजेच भूमीला प्रार्थना केल्यावर शक्‍तीचा प्रवाह वेदीकडे आकृष्ट होतो.
१ अ. शक्‍तीच्या वलयांची वेदीमध्ये निर्मिती होणे आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.

२. शक्‍तीची स्पंदने वेदीच्या मध्यभागी घातलेल्या जवाच्या ठिकाणी निर्माण होतात.
जवाच्या वर आधी दिल्याप्रमाणे विविध वस्तू घालून सिद्ध केलेला तांब्याचा कलश आणि ताम्हन ठेवून वरुणदेवतेला आवाहन केल्यानंतर कलशात पुढीलप्रमाणे प्रवाह आकृष्ट होतात.
३. ईश्‍वरी तत्त्व
४. आनंद
५. चैतन्य

कलशात पुढीलप्रमाणे वलये निर्माण होऊन ती कार्यरत स्वरूपात फिरणे

३ अ. ईश्‍वरी तत्त्व
४ अ. आनंद
५ अ. चैतन्य
५ आ. चैतन्याच्या प्रवाहांचे वलयातून वातावरणात प्रक्षेपण होणे

शक्‍ती
६. कलशामध्ये घालण्यात येणार्‍या वस्तूंमुळे त्यामध्ये शक्‍तीचा प्रवाह आकृष्ट होतो.
६ अ. शक्‍तीचे वलय कलशामध्ये निर्माण होते.
६ आ. शक्‍तीच्या वलयातून शक्‍तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
६ इ. शक्‍तीच्या कणांचे कलशातून वातावरणात प्रक्षेपण होते.
६ ई. सप्‍तधान्य पेरल्यामुळे वेदीवर शक्‍तीचे कण कार्यरत रूपात फिरतात.
नवरात्रीतील घटस्थापनेच्या विधीतून शक्‍तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होणे कलशात घालण्यात येणार्‍या वस्तूंतून निर्माण
होणारी स्पंदने, त्यांचे प्रमाण आणि रंग (तत्त्वाच्या स्वरूपात)









येथे दिसणे आणि जाणवणे यांची क्रिया एकत्र झाली. म्हणजेच कधी तत्त्वाच्या जाणवण्यावरून त्याचा रंग दिसला, तर कधी रंगाच्या दिसण्यावरून (बुद्धीचा वापर करून) तत्त्व निश्चित केले. पहिल्यांदाच असे झाले आहे, उदा. पिंपळात निळसर रंग दिसला. यावरून `तेथे विष्णुतत्त्व अधिक आहे', असा विचार मनात आला. औदुंबरात दत्ततत्त्व अधिक असल्याने तेथे तांबडा (वैराग्याचा) रंग दिसला. - कु. प्रियांका लोटलीकर

इतर सूत्रे
१. चाळलेल्या मातीपासून सिद्ध केलेल्या वेदीमध्ये पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक असते.
२. वेदीतील भूमीला प्रार्थना केल्यामुळे तिच्यातील शक्‍तीस्वरूप तत्त्व प्रकट होते. या शक्‍तीस्वरूप प्रकट भूमीतत्त्वामुळे पाताळातून आक्रमण करणार्‍या शक्‍तींना आळा बसतो.
३. वेदीच्या मध्यभागी ठेवलेल्या जवामध्ये शक्‍तीची स्पंदने कार्यरत स्वरूपात असतात. त्यामुळे वातावरणात मातीच्या गंधाचे (पृथ्वीतत्त्वाचे) प्रक्षेपण होते.
४. जवावर कलश ठेवण्यात येतो. त्या वेळी जवामध्ये शक्‍तीची स्पंदने कार्यरत होतात. त्यामुळे कलशाला आधार मिळतो.
५. कलशात पवित्र नद्यांना आवाहन करून जल घालण्यात येते. त्यामुळे जलामध्ये आपतत्त्वात्मक चैतन्य निर्माण होत असल्याचे जाणवले.
६. घटस्थापना विधीमध्ये कलशाला दोरा बांधण्यात येतो. त्यामुळे देवतांची कलशात निर्माण झालेली तत्त्वे दीर्घकाळ कार्यरत रहातात.
७. कलशाच्या वर ताम्हनात तांदूळ ठेवण्यात येतात. तांदुळामध्ये असणार्‍या चैतन्यामुळे ताम्हनात देवीला आसन प्रदान करण्यात येते.
८. वेदीवर सात प्रकारची धान्ये पेरण्यात येतात.
९. `सृष्टीच्या निर्मितीत उत्पत्तीजन्य शक्‍तीचे प्रतीक म्हणून ही कडधान्ये पेरण्यात येतात', असे जाणवले.
१०. कडधान्यांना प्रार्थना करून त्यावर जलस्वरूप पर्जन्याचा वर्षाव करतात. म्हणजेच `सृष्टीच्या आवश्यक शक्‍तीचे पूजन करून कृपा संपादन करण्यात येते', असे जाणवले.'
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (भाद्रपद कृ. नवमी, कलियुग वर्ष ५१११ (१३.९.२००९))

आधुनिक शिक्षण नव्हे, तर धर्मशिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केल्यासच मनुष्यजन्माचे सार्थक होते; कारण धर्मशिक्षणानेच `आचार कसा असावा', हे कळते.

Read more...

श्री गणेश पूजाविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !

कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव' हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे', या भावानेच सर्व उपचार करावेत.



१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.
१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम,
३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो,
६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग,
३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी
१ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली
१ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती
१ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग,
४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)

१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे
१ इ १. पूजास्थळाची शुद्धी
अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.
१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे
१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.'

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।' हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे', असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि' असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा
।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:' हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे.
१. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:' या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविंदाय नम: ।
पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: ।
२०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।।
पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.
देवतास्मरण
श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।
देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल' म्हणावा.
श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा.
ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा.
`तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।।
संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.




श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.
ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा.
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो.
श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।
आवाहन : उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.)
`श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।'
आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात.
श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि' हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत.
श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.)
श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये
नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये
नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे.
प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' अशा प्रकारे म्हणतात.)
हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.
श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं
समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी.
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।
अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने.
यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्' हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे.
अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।
श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो' म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।' असे म्हणावे.

कलशपूजन
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.
शंखपूजा
शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.
घंटापूजा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।
अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो.
घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
दीपपूजा
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)
मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि' या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे.
मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी
अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो.
पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.
पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा
प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे', असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप - प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.)
अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर `परमात्मने नम: ।' असे १५ वेळा म्हणावे.
ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.



(टीप - हा मंत्र वेदोक्‍त आहे. )
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं
ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय
नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.
२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना देवांच्या चरणी वहा.
विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।
३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।
४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.

अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।।
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि' म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा.
रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात.
राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर.
उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे.
श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर.
श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.)
श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)
१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.



अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो.
महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे.
श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: ।
तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.
श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ
पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर)
पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि' असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी.
श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं
समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा)
श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)
यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी.
वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: ।
आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।
भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: ।
अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.
नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।
फुलाला गंध लावून देवाला वहावे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
यानंतर आरती करून कापूरारती करावी.
पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.
नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी.
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
प्रदक्षिणां समर्पयामि ।।
दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)
दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।' असे म्हणावे.
श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: ।
श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।।

नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक ।
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।।
श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.
अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता
प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.)
प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय ।
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् ।
विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।
यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।' असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी')


Read more...