गणेशोत्सव विशेष - ७

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण गणपति व इतर देवता यांचे साम्य याविषयी माहिती जाणून घेऊया.




१३. गणपति व इतर देवता
१३ अ. शिव व गणपति :
`सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला आणि शिवपुत्र मानतो; पण अशी ही एक कल्पना आहे की, शिव आणि श्री गणेश या देवता पूर्वी एकरूपच होत्या; जो शिव तोच श्री गणेश आणि जो श्री गणेश तोच शिव होता. श्री गणपति अथर्वशीर्षात गणेशाला उद्देशून `त्वं ब्रह्मा त्वं विष्णु: त्वं रुद्र: ।', असे म्हटले आहे.
श्री गणेश व शिव यांचे साम्य व सामर्थ्य सहज कळावे इतके ठळक आहे. भालचंद्र, तृतीयनेत्र व नागभूषणे ही शिवाची तीन वैशिष्ट्ये श्री गणेशमूर्तीतही आढळतात. श्री गणेशाला भालचंद्र असे नाव आहे. `गजवदनमचिंत्यम्' या श्री गणेशाच्या ध्यानश्लोकात त्याला त्रिनेत्रीही म्हटले आहे. तसेच श्री गणेशाच्या कमरेभोवती नागबंधही आहे. शंकराने हालाहल प्राशन केल्यानंतर तज्जन्य दाह शांत करण्यासाठी सूर्यभूषणे घातली व मस्तकी चंद्र धारण केला, अशी कथा आहे. श्री गणेशाबद्दलही अशीच कथा गणेशपुराणात आढळते. अनलासुर अग्नीरूपाने जग जाळीत होता, तेव्हा त्याचे श्री गणेशाने भक्षण केले; मग त्याचा दाह शांत करण्यासाठी देवांनी श्री गणेशावर सर्प, चंद्र इत्यादी शीतलोपचार केले.'

१३ आ. हनुमान व श्री गणपति : या दोघांचा रंग लाल आहे. या दोघांकडे अष्टमहासिद्धी आहेत. हनुमानाला रुई वहातात, तर श्री गणपतीला पांढरी रुई, म्हणजे मंदार, याची पत्री वहातात.

१३ इ. ओंकार (ॐ) व गणपति : `सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सांगतांना, सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी `ॐ इतिध्वनिरभूत्' म्हणजे `ॐ' असा ध्वनी झाला. या ध्वनीचे दृश्यस्वरूप `सवै गजाकर: ।', म्हणजे तो ध्वनी, म्हणजेच ओंकार हा हत्तीच्या मुखासारखा आहे, असे सांगितले आहे. म्हणजे प्रथमत: ध्वनी झाला व तो `ॐ' असा झाला. हा ओंकार उभा करून पहा, म्हणजे `तो गणपतीच्या मुखासारखा आहे', हे लक्षात येईल. तात्पर्य, ॐ व श्री गणपति हे एकच आहेत, भिन्न नाहीत; म्हणून ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. सृष्टीच्या प्रारंभी ॐ व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाचा कंठ भेदून बाहेर आले.
ओंकारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा ।
कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ।।
म्हणून हे दोन शब्द मंगलवाचक आहेत, असे म्हटले आहे. ओंकार हे
श्री गणपतीचे स्वरूप आहे.' (?)

१३ ई. कुंडलिनी व गणपति : श्री गणपति अथर्वशीर्षात ऋषींनी गणेशाचे वर्णन `मूलाधारस्थितोऽसि नित्यं', म्हणजे `तू शरिरातील मूलाधारचक्राच्या ठिकाणी नित्य रहातोस', असे केले आहे. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता समजली जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत. श्री गणपतीचा रंगही लाल आहे. मूलाधार हे षट्चक्रांतील आरंभीचे चक्र असून आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ मूलाधारचक्र जागृत झाल्यावर होतो. तसेच कोणत्याही कार्यारंभी श्री गणपतीची पूजा करतात.
(समाप्त)

Read more...

गणेशोत्सव विशेष - ६

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अश्लील चित्रपटगिते लावण्यापेक्षा देवतांचा नामजप लावा !
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण अथर्वशीर्षासंबंधी माहिती जाणून घेऊया.


अथर्वशीर्ष
थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती व शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्‍त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्‌गलऋषी यांनी `साममुद्‌गल गणेशसूक्‍त' लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी `श्री गणपति अथर्वशीर्ष' लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते व स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी व ध्यान नंतर आहे.
अथर्वशीर्षाचे पुढील तीन प्रमुख भाग आहेत -
१. शांतीमंत्र : सुरुवातीला `ॐ भद्रं कर्णेभि:' व `स्वस्तिन: इंद्रा.....' हे मंत्र आणि शेवटी `सह नाववतु ।......' हे मंत्र
२. ध्यानविधी : `ॐ नमस्ते गणपतये' येथपासून ते `वरदमूर्तये नम:' येथपर्यंतचे दहा मंत्र
३. फलश्रुती : `एतदथर्वशीर्ष योऽधीते' इत्यादी चार मंत्र
अथर्वशीर्ष म्हणणे : हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.
१. उच्चार अगदी स्पष्ट असावेत.
२. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
३. स्तोत्रपठण `तदर्थभावपूर्वक तत् अर्थ भावपूर्वक', म्हणजे `त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह' झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्‍त आणि भगवच्छक्‍तीयुक्‍त झाला पाहिजे.
४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा `वरदमूर्तये नम: ।' येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा.
५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. ८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी बदलावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी.
९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
१०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे.
११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा.
१२. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी जमल्यास श्री गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी व तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान
श्री गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास सुरुवात करावी.
१३. उच्चारात चुका होऊ नयेत; म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते जाणत्या व्यक्‍तीकडून शिकून घ्यावे. १४. स्तोत्र म्हणतांना श्री गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.

अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे
१. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने व फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने स्तोत्रपठण करणार्‍याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते.
२. स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्‍ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्‍तीच्या त्रासापासून रक्षण होते. (क्रमश:)
(संदर्भ : अथर्वशीर्ष स्तोत्र व त्याचा सविस्तर अर्थ सांगणारा सनातनचा लघुग्रंथ `श्री गणपत्यथर्वशीर्ष व संकष्टनाशन श्री गणेशस्तोत्र (अर्थासह)' ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल (०२१४३) २३३ १२०

मिरवणुकीत श्री गणेशाचा नामजप करा !
मिरवणुकीतून जातांना मोठ्या आवाजात अश्लील चित्रपटगीते लावणे वा म्हणणे त्याबरोबर हिडीस अंगविक्षेप करत वाचणे, गुलाल उधळणे व जोरजोरात ओरडणे, अशा प्रकारची गैरवर्तणूक करण्याने वातावरण सात्त्विक न बनता तामसिक बनते. त्यामुळे त्याचा मिरवणुकीतील नागरिकांना फायदा न होता उलट समाजाची सात्त्विकता कमी होण्यास कारणीभूत ठरते.

Read more...

गणेशोत्सव विशेष - ५

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण ज्येष्ठ गौरी हे व्रत करण्याची पद्धत व अनंत चतुर्दशी यांविषयी शास्त्रोक्‍त माहिती जाणून घेऊया.


ज्येष्ठा गौरी
१. तिथी : `भाद्रपद शुद्ध अष्टमी२. इतिहास व उद्देश :
असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्री महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्‍त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

व्रत करण्याची पद्धत
अ. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री लक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात.

आ. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.

इ. तिसर्‍या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात व परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.'

अनंत चतुर्दशी

१. तिथी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
२. उद्देश : मुख्यत:
हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते.
३. व्रत करण्याची पद्धत : या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष व यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताची सुरुवात कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात व मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्‍त असल्यास विशेष लाभदायक ठरते. (क्रमश:)

संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति'

नागरिकांना आवाहन !आपल्या परिसरातील वा आपल्याला माहीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांकडून गैरप्रकार होत असल्यास त्याला विरोध न करणे म्हणजे याला मूकसंमती देणे होय. धर्माच्या दृष्टीकोनातून धर्मद्रोही कृत्ये करणारा व त्याला मूकसंमती देणारा, हे दोघेही सारखेच गुन्हेगार ठरतात. गैरप्रकार घडू नयेत, यासाठी आपण समाजाचे घटक आहोत, हे लक्षात ठेवून चुकीच्या गोष्टींविरुद्ध कृती करावयास हवी !

उद्याच्या खंडणीबाजांच्या विरोधात आजच कृती करा !
गणेशोत्सवातील निधीसंकलनाच्या वेळी करण्यात येणार्‍या जबरदस्तीच्या विरोधात कृती करणे, हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे, तसेच पोलिसांचे कर्तव्य आहे. आज धार्मिक उत्सवाची वर्गणी जमा करतांना लोकांवर जबरदस्ती करणार्‍यांमधून पुढे खंडणीबाज निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घ्या. जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा !

Read more...

गणेशोत्सव विशेष - ४

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
गणेशभक्‍तांनो, अंनिसच्या अशास्त्रीय `मूर्तीदान मोहिमे'ला विरोध करून शास्त्रोक्‍त मूर्तीविसर्जनच करा !
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपति पूजन, गणेश विसर्जन आदींविषयी शास्त्रोक्‍त विधी जाणून घेऊया.



सनातनची सात्विक श्री गणेशमूर्ती



१२ उ १० अ. `मूर्तीदान' हे अशास्त्रीय, तर `मूर्तीविसर्जन' हेच योग्य : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या जलात किंवा जलाशयात करणे आवश्यक असते, असे शास्त्रात सांगितले असले तरी जलप्रदूषण, अवर्षण इत्यादींमुळे `मूर्तीविसर्जन' याकडे काही जण समस्या म्हणून पहातात. त्यावर उपाययोजना म्हणून `अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)'सारख्या धर्मद्रोही संघटना मूर्तीविसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे हास्यास्पद आवाहन करतात. मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय असून तो श्री गणेशाचा अवमान आहे. `गणपतीच्या मूर्तीचे दान' अशास्त्रीय असल्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्‍त विधीच आहे.
२. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही.
३. श्री गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे, की जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.
अंनिसचे कार्यकर्ते भाविकांकडून मूर्तीदान म्हणून घेऊन नंतर त्या दगडांच्या खाणींमध्ये फेकून देतात, असे निदर्शनास आले आहे. आपल्या श्रद्धास्थानाची ते अशी `विल्हेवाट' लावतात. मग आपण असा धर्मद्रोह का होऊ द्यायचा ? `सनातन संस्था' यासंदर्भात दरवर्षी जनजागृती मोहीम राबवते. आपणही मूर्तीदान करू नका, तसेच धर्मरक्षणाच्या कार्यासाठी सनातनच्या मोहिमेत सहभागी व्हा !

१२ उ १० आ. आपत्कालीन परिस्थितीत `मूर्तीविसर्जन' कसे करावे ? : काही ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जलाशयाचा पुरेसा साठा नसतो. काही ठिकाणी सर्व जलस्रोत दूषित असल्याने मूर्ती विसर्जन करण्यासाठी योग्य नसतात, तसेच
एखाद्या ठिकाणी दुष्काळ अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यासही मूर्तीचे विसर्जन करणे शक्य होत नाही. अशी स्थिती असल्यास त्यावर पुढील दोन प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो.

१. मूर्तीची प्रतिष्ठापना न करता त्याऐवजी सुपारी ठेवून सुपारीवर प्रतिकात्मक
श्री गणपतिपूजन करावे. सुपारीचे विसर्जन छोट्या विहिरीत किंवा ओहोळात करता येते.

२. श्री गणेश चतुर्थीसाठी धातूची नवीन मूर्ती आणावी व तिची प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा करावी. आपल्या दररोजच्या पूजेत श्री गणपति असला तरी नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश असा आहे - गणेश चतुर्थीच्या वेळी पृथ्वीवर गणेशलहरी खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्‍ती येईल. जास्त शक्‍ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. यासाठी धातूची नवीन मूर्ती आणावी. विसर्जनाच्या वेळी अशी मूर्ती जलात विसर्जन करण्याची आवश्यकता नसते. विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या व मूर्ती उजव्या हाताने जागेवरून थोडी हालवावी. त्यानंतर मूर्ती घरात एखाद्या पवित्र जागी ठेवावी. विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीतील तत्त्वही विसर्जित होते. त्यामुळे अशा मूर्तीची दररोज पूजा करण्याची आवश्यकता नाही. पुढील वर्षी या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करून पूजा करावी.

२ उ ११. मूर्तीभंग : `प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जनापूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला, तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे. जर ही घटना श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ती पुजावी व दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहिताच्या सल्ल्याने यथावकाश `अद्भुत दर्शन शांती' करावी. दीपपतन, दृषद्स्फुटन (पाटा फुटणे), आळवाला फूल येणे, मूर्ती भंग पावणे इत्यादी अद्भुते घडल्यास त्या कुटुंबात द्रव्यहानी, गंभीर आजार वा अपमृत्यू घडण्याची शक्यता असते; म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा.' (क्रमश:)

Read more...

गणेश चतुर्थीबाबतचे शास्त्र असे आहे !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
Read more...

गणेशोत्सव विशेष - ३

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या मूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ पाहूया.


सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती



गणपतीला तुळस न वहाण्याचे कारण
पौराणिक कारण : `एक अप्सरा अती सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या, `हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा !' ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, `हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?' ती म्हणाली, `मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.' गणपति म्हणाला, `मी कधीच विवाह करून मोहपाशात पडणार नाही.' त्यावर अप्सरा म्हणाली, `तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.' गणपतीने तिला प्रतिशाप दिला, `तू पृथ्वीवर वृक्ष होशील.' अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, `मला क्षमा कर.' गणपति म्हणाला, `माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.' ती अप्सरा पुढे तुळस बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वहात नाहीत.'

अन्य कारण : श्री गणपति ही जास्तकरून सकाम भक्‍तीची देवता आहे, तर तुळस ही वैराग्यदायक आहे; म्हणून गणपतीला तुळस वहाणे निषिद्ध समजतात.

चतुर्थी
इतिहास : गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा व चतुर्थीचा संबंध जोडला गेला.

श्री गणेशजयंती : माघ शुद्ध चतुर्थी ही `श्री गणेश जयंती' म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते.

श्री गणेश चतुर्थी
महत्त्व : विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत जास्त प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता जास्त असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी व्हायला मदत होते. (या लहरींविषयी अधिक माहिती सनातनचा ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते' यात दिली आहे.)
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ हजार पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

कुटुंबात कोणी करावी ? : `श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे `सिद्धीविनायक व्रत' या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्‍त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्‍त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.'

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे - श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्‍ती येईल. जास्त शक्‍ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात व ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज व तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्‍तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्‍तीला शक्य नसते.

श्री गणेशाभोवती सजावट करतांना गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या आकृतीबंधाचा वापर करणे : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. गणेशतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दूर्वा, शमीची पत्री, मंदारची पत्री इत्यादी वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही गणेशतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते. (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्री गणपति'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : रत्‍नागिरी (०२३५२) २२२३४६, चिपळूण (०२३५५) २५३८०८



--------------------------------------------------------------------------------


श्री गणेश चतुर्थी आदर्शरीत्या साजरी करून गणेशतत्त्वाचा लाभ मिळवूया !
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. `आपल्या घरात गणपति येणार आहे', या कल्पनेने आपले मन भरून येते. काही कुटुंबांत तर गणेश चतुर्थीची तयारी एक महिना आधीच सुरू होते. संपूर्ण घराची साफसफाई करणे, घराला रंगरंगोटी करणे इत्यादी सेवा सुरू होतात. गणेशोत्सवाला ४-५ दिवस असतांना मोदक, करंज्या बनवणे सुरू होते. या उत्सवात नातेवाईक व मित्रमंडळी घरी येतात; पण नेमकं होतं काय, तर आपण उत्सवामध्ये मनोरंजनात कधी मग्न होतो, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे `गणपति आपल्या घरी आहे', हेच आपण विसरतो. या उत्सवात आपण करत असलेल्या कृतींतील त्रुटी वगळल्यास व दृष्टीकोन योग्य ठेवल्यास आपल्याला श्री गणेशाचा आध्यात्मिक फायदा पूर्णपणे मिळून श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या कष्टाचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल. काल आपण धार्मिक विधी कशा करायच्या ते पाहिले. आज आपण आरती करतांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते पाहूया.

आरती करतांना खालील गोष्टी टाळाव्यात
अ. आरती सुरू झाल्यानंतर अव्यवस्थितपणे उभे रहाणे.
आ. कर्णकर्कश स्वरात व अनेक आरत्या म्हणणे
इ. देवाशी काडीमात्र संबंध नसलेल्या गीतांच्या किंवा चित्रपट गीतांच्या चालीत असलेल्या आरत्या लावणे
ई. आरती चालू असतांना एकमेकांकडे पाहून हसणे, खाणाखुणा व चेष्टा करणे इत्यादी (क्रमश:)

साभार - गणेशोत्सव विशेष - ३

Read more...

Special Series of Ganesh Chaturthi Videos And Articles

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


Special Series of Ganesh Chaturthi Videos


Series of Articles Related to Lord Ganesh



This series of articles contain spiritually scientific information about Lord Ganesh। For details about Ganesh Chaturthi Rituals and Public Ganesh Festival, please visit


this section।


VIDEO : ।hindujagruti.org/videos/index.php?id=6">http://www।hindujagruti.org/videos/index.php?id=6


ARTICLES : http://www.hindujagruti.org/hinduism/knowledge/category/ganapati


गणपतीविषयक - आध्यात्मिक माहिती



अनुक्रमणिका

गणेश जयंतीविषयी ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान


गणेश मंत्रांचे महत्त्व


कार्याच्या अनुषंगाने गणपतीची विविध रूपे


गणपतीचे वाहन


शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?


श्रीगणेशाशी संबंधित साधकांना आलेल्या अनुभूती


गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या काही रांगोळया


कलाकारांनो, गणपतीचे विडंबन म्हणजे कलात्मकता नव्हे!


विभक्त कुटुंबामध्ये गणपतीपूजन कसे करावे? - ध्वनीचित्रपट


श्री गणपती मध्यपूजाविधी - ध्वनीचित्रपट


श्री गणपती उत्तरपूजाविधी - ध्वनीचित्रपट


गणपतीपूजन व तिथी - ध्वनीचित्रपट


गणेशपूजनासाठी स्वतंत्र मूर्ती का आणावी? - ध्वनीचित्रपट


विविध रूपातील गणेशमूर्ती पूजावी का? - ध्वनीचित्रपट


गणेशमूर्तीच्या पाटाखाली तांदूळ का ठेवावेत? - ध्वनीचित्रपट


गणेशमूर्ती किती दिवस पूजावी? - ध्वनीचित्रपट


सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार - ध्वनीचित्रपट

Read more...

गणेशोत्सव विशेष - २

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेशाच्या उपासनेमुळे बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते !

भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त
श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीची काही वैशिष्ट्ये पाहू.

विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा
`श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्‍ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्‍ती जोर करत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. `मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले', याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर होऊ लागते.' - प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सर्व संप्रदायांना पूज्य
`आपली उपास्यदेवताच सर्वश्रेष्ठ आहे व तीच विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी आहे; अन्य देवता नाहीतच', असे सांप्रदायिक मानतात. संप्रदाय अनेक असले, तरी प्रत्येक संप्रदायात श्री गणेशपूजा आहे. शैव संप्रदायात श्री गणपति हा शिवाचा पुत्र आणि शिवाचा मुख्य गण असा आढळतो, तर वैष्णव संप्रदायात तो अनिरुद्ध, वासुदेव आदी रूपांत आढळतो. शाक्‍त संप्रदायात (देवी संप्रदायात) दक्षिणमार्गी आणि वाममार्गी असे दोन प्रकार आहेत. दोन्हींमध्ये श्री गणेशपूजन केले जाते. या संप्रदायात तो शक्‍तीगणपति, लक्ष्मीगणपति अशा वैवाहिक रूपांत दर्शवला जातो, तसेच स्त्रीरूपातही पुजला जातो. श्री गणेशपूजन जैन पंथातही केले जाते. बौद्ध धर्म स्वीकारणार्‍या सम्राट अशोकाच्या चारुमती नावाच्या कन्येने नेपाळमध्ये श्री गणेशमंदिर बांधले. `हेरंब' या नावाने प्रसिद्धी पावलेला तेथील श्री गणेश सिंहासनाधिष्ठित असून त्याला पाच मस्तके व दहा हात आहेत, असा उल्लेख श्री गणेशसाहित्यात आढळतो.


संतांनी गौरविलेले दैवत

निरनिराळया साधनामार्गांतील संत वेगवेगळया देवतांचे उपासक असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी व त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. सर्व संतांसाठी श्री गणेश ही अतीपूजनीय देवता होती. मराठी संतवाङ्मयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि पारलौकिक स्वरूप मोठ्या सुबकरीत्या वर्णन केलेले आढळते. संतशिरोमणी श्री ज्ञानदेवमाउलींनी भावार्थदीपिकेच्या (ज्ञानेश्‍वरीच्या) आरंभी `देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु' असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला पुढीलप्रमाणे प्रथमवंदन केले आहे - `ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या । वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्रीगणेशा ।।' संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला व श्री गणेशाला एकाच वेळी भोजनास बोलावल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांनी `लंबोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।', असे म्हटले आहे. संत तुलसीदासांनीही `रामचरितमानस'च्या आधी श्री गणेशस्तवन केले आहे. (क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति')

Read more...

गणेशोत्सव विशेष - १

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या महागणपति या नावाचा अर्थ, तसेच श्री गणपतीचे महत्त्व, कार्य व त्याची वैशिष्ट्ये पाहू.




महागणपति

ऋद्धि-सिद्धि (शक्‍ती) यांच्यासहित असलेला श्री गणपति म्हणजे महागणपति होय. `पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात श्री गणपतीचे आवाहन केले. जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असल्यामुळे महत्तत्त्वास महागणपति म्हणतात. महागणपति जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा निखळ मोक्षप्राप्‍तीस्तव आराधला जातो, तेव्हा उजवीकडे सोंड असलेला श्री गणपति घेण्याची प्रथा आहे; पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिव श्री गणपति असतो. काही सोन्याचांदीच्या उजव्या सोंडेच्या श्री गणपतीच्या मूर्ती क्वचित आढळतात. `प्रत्येक पुरुषदेवतेची एकेक शक्‍ती मानली जाते, उदा. ब्रह्मा - भारती, श्रीविष्णु - श्री लक्ष्मी, शिव - पार्वती. गाणपत्यांनीही परब्रह्मरूप गणपतीची एक शक्‍ती मानली असल्यास नवल नाही. श्री गणपति त्याच्या शक्‍तीस मांडीवर घेऊन आलिंगन देत असल्याचे शिल्प उपलब्ध आहे. आजही असे रंगवलेले चित्र पहावयास मिळते. त्याचप्रमाणे `सिद्धि' आणि `बुद्धि' या त्याच्या दोन पत्‍नी त्याच्या दोन्ही बाजंूस बसलेल्या आहेत, असेही शिल्प उपलब्ध आहे. या शक्‍तीसह श्री गणपतीला तंत्रशास्त्रात `महागणपति' असे म्हटले आहे।


महत्त्व

कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करण्याचे महत्त्व : पूजास्थानी इतर देवता श्री गणपतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करतात. श्री गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपतिपूजन असे म्हणतात. (गाणपत्य संप्रदायात ब्रह्म याऐवजी गणपति व परब्रह्म याऐवजी महागणपति हे शब्द वापरतात.)

कार्य व वैशिष्ट्ये


अ. विघ्नहर्ता : विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.
आ. प्राणशक्‍ती वाढवणारा : मनुष्याच्या शरिरातील निरनिराळी कार्ये निरनिराळया शक्‍तींद्वारे होत असतात. (या निरनिराळया शक्‍तींबद्दल माहिती सनातनच्या `हठयोग' या ग्रंथातील `प्रकरण ६. प्राणायाम' यात दिली आहे.) त्या निरनिराळया शक्‍तींच्या मूलभूत शक्‍तीला `प्राणशक्‍ती' असे म्हणतात. श्री गणपतीचा नामजप प्राणशक्‍ती वाढवणारा आहे. (क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति')


हिंदूंनो, गणेशोत्सवातील गैरप्रकार बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्या !

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात चौकाचौकात ध्वनीक्षेपकावर मोठ्याने गाणी लावली जातात. त्यासाठी मोठे ध्वनीवर्धक लावून ही सार्वजनिक मंडळे एकामेकांशी चढाओढ करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते व अवतीभोवती रहाणार्‍या जनतेचे जगणे दुर्धर होऊन जाते. यात त्या मंडळांतील सदस्यांच्या ओरडण्याचीही भर असते. असे ध्वनीवर्धक रात्री उशिरापर्यंत लावले जातात. सार्वजनिक ठिकाणी ध्वनीवर्धकावर मोठ्या आवाजात गाणे लावून अवतीभोवती रहाणार्‍या लोकांना त्रास होईल, असे वर्तन करणे कायद्याने गुन्हा आहे. आपल्याला असा त्रास झाल्यास मंडळांच्या विरोधात पोलिसांत लेखी फिर्याद नोंदवा. त्याची एक प्रत सनातनला पाठवा. पोलीस ठाण्यात जातांना दोन-चार जणांना बरोबर घेऊन जा. ध्वनीमुद्रक घेऊन जा. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिल्यास त्यांच्या वरिष्ठांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार करा.

निगडीत वृत्त : श्री गणपति विशेष

गणेशोत्सव जनजागृती चळवळीत आपण हे करू शकता !
वक्रमार्गाने चालणार्‍यांना शिक्षा करून सरळ मार्गावर आणणारा तो वक्रतुंड !

Read more...