Gurupoornima (Vyas-puja)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


Transformation of self is the best gift to the Guru on Guru Purnima






The types of DiscipleThe types of Disciple
The superior disciple is a seeker who inspite of being trapped in unhappiness in the state of the embodied soul is convinced that “I am not the embodied soul but am really The Supreme God (Shiv)” through the study of the scriptures.

The Guru PrincipleThe Guru Principle
This day is celebrated every year to express gratitude unto the Guru Principle. The Guru Principle is a thousand times more active on the day of Gurupournima than on any other day.
 

GurukrupayogaGurukru payoga
The word krupa has been derived from the root ‘krup’, which means to have mercy. Union of a jiva (Embodied soul) with Shiv (God Principle) by Guru’s grace is known as ‘Gurukrupayoga’.
 

Sadguru and Paratpar GuruSadguru and Paratpar Guru
Today ‘Guru, Sadguru and Paratpar Guru’ are used as synonyms; however, there is a marked difference between them in the spiritual context. Let us see how.
 

GurumantraGurumantra
Gu rumantra does not contain mere letters, but has spiritual knowledge, Chaitanya and Guru’s blessings. Hence, spiritual progress is faster.
 
 

Types of GuruTypes of Guru
An ideal Guru is the one, who if the need arises, even forces the disciple to act in a particular manner, if he is inattentive or misbehaving.
 
 

Gurupoornima MessageGurupoornima Message
Gurupoornima is the day to express gratitude unto the Guru. Instead of expressing gratitude for just a day, participating in the mission as expected by the Guru consistently the entire year would be real gratitude.
 

RudrakshaRudraksha 
Adorning a rudraksha-mala while worshipping Shiva is ideal. Followers of the Natha and Vama sects and Kapaliks especially use the rudraksha.
 
 

Gurupoornima (Vyas Puja)Gurupoornima (Vyas Puja)
Gurupoornima is a unique opportunity for acquiring God’s grace. Gurupoornima is a golden opportunity to preserve the Guru-disciple tradition.
 

The Best Guru And The Best GurusevaThe Best Guru And The Best Guruseva
The Guru is one who eliminates the covering of Maya (The Great Illusion) in the form of ignorance enveloping spiritually curious people, seekers and disciples, and makes them aware of their true self.
 

Read more...

गुरुपौर्णिमा (व्यासपूजन)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा





 मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रस्तुत लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच हा उत्सव साजरा करण्याची पद्धत पहाणार आहोत.


तिथी

         गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. (तामिळ प्रदेशात व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस साजरा करतात.)


उद्देश

         गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.


महत्त्व

१. गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.


अधिक वाचा  : http://www.sanatan.org/mr/a/cid_316.html


Read more...

शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

शिव

अनुक्रमणिका

 


शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती

सूक्ष्म-ज्ञान प्राप्‍तकर्त्या साधकांना शिवाविषयी मिळालेले ज्ञान


सनातनने प्रसिध्द केलेले सात्त्विक चित्र 

`ॐ नमः शिवाय' नामजप

बहुतेकांना देवाबद्दल जी थोडीफार माहिती असते, ती बहुधा लहानपणी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींमुळे असते. अशा अल्प माहितीमुळे त्यांचा देवावरचा विश्‍वासही थोडाफारच असतो. देवाबद्दल जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्‍वास निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे श्रद्धा वाढून साधनाही चांगल्या तर्‍हेने होते. महादेव, भालचंद्र अशी शिवाची काही नावे व त्यांचा अर्थ; शिवाच्या डोक्यावरील गंगा व चंद्र, शिवाचा तिसरा डोळा अशी शिवाची वैशिष्ट्ये; विश्‍वाची उत्पत्ती करणारा, त्रिगुणातीत करणारा, असे शिवाचे कार्य; शिवाच्या उपासनेत बेल, पांढरी फुले व भस्म यांचे महत्त्व इत्यादी शिवाबद्दल इतरत्र बहुधा न दिलेली; पण उपयुक्‍त अशी अध्यात्मशास्त्रीय माहिती आज आपण पाहूया.

व्युत्पत्ती व अर्थ
अ. `शिव' हा शब्द वश् या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट, या पद्धतीने तयार झाला आहे. वश् म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाशी आहे. तो स्वत: प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो.

आ. शिव म्हणजे मंगलमय व कल्याणस्वरूप असे तत्त्व.

शिवाची काही इतर नावे

अ. शंकर : 
`शं करोति इति शंकर: ।' शं म्हणजे कल्याण व करोति म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.
आ. महांकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ (महान्काल) आहे; म्हणून याला `महांकालेश्वर' म्हणतात.

इ. महादेव : विश्वसर्जनाच्या व व्यवहाराच्या विचाराशी मूलत: तीन विचार असतात - परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान व परिपूर्ण साधना. हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास देवांचा देव, म्हणजेच `महादेव', असे संबोधतात.

वैशिष्ट्ये

अ. शारीरिक व भौतिक वैशिष्ट्ये

अ १. गंगा :
 ग्रहमालेचा केंद्रबिंदू म्हणजे सूर्य, शरीराचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मा, तसा प्रत्येक वस्तूच्या चैतन्याचा व पवित्रकांचा (सूक्ष्म चैतन्यकण) केंद्रबिंदू म्हणजे `गँ' होय. `गँ' ज्याच्यापासून गमन करतात असा ओघ म्हणजे गं ग: `गंगा.' शिवाच्या डोक्यातून `गँ' वहातात. यालाच `शिवाच्या डोक्यावरून गंगा अवतरली', असे म्हणतात.
पृथ्वीवरील गंगा नदीत या आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदूषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते; म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली तरी गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे सूक्ष्मातील कळणार्‍यांनाच नाही, तर शास्त्रज्ञांनाही जाणवते.

अ २. चंद्र : शिवाच्या कपाळी चंद्र आहे. ममता, क्षमाशीलता व वात्सल्य (आल्हाद) या लहरी जेथून निघतात त्याला `चंद्र' म्हणतात. म्हणजेच चंद्रमा ही ममता, क्षमाशीलता व वात्सल्य (आल्हाद) या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

अ ३. तिसरा डोळा :
अ. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा व भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्म रूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा व उजवा अशा दोन्ही डोळयांच्या संयुक्‍त शक्‍तीचे प्रतीक आहे, तसेच अतींद्रिय शक्‍तीचे महापीठ आहे. यालाच ज्योतीर्मठ, व्यासपीठ वगैरे नावे आहेत.

आ. शंकर त्रिनेत्र आहे म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.

इ. योगशास्त्रानुसार तिसरा डोळा म्हणजे सुषुम्नानाडी.

अ ४. नाग 
अ. वेगवेगळे नाग म्हणजे पवित्रकांचे संघ होत. हे बाहेरून नाग दिसत असले, तरी आतून ते एका प्रकारे शिड्याच असतात. उन्नतीसाठी या नागांच्या शेपटीला धरून वर जायचे असते. या नागांचे म्हणजे पवित्रकांचे पालन करून त्यांना हाराप्रमाणे गळयात धारण करणारा'; म्हणून शिवाला `भुजंगपतीहारी' असेही म्हणतात.

अ ५. भस्म : भू-भव म्हणजे जन्माला येणे. अस् - अस्म - अश्म म्हणजे राख. जे जन्माला येते व राखेत जाते, त्याला `भस्म' म्हणतात. भस्म म्हणजे जन्मलेल्याची राख. श्म (स्म) म्हणजे रक्षा, राख आणि शृ - शन् म्हणजे विखुरलेली; म्हणून जेथे राख विखुरलेली आहे, ते स्मशान होय. भस्मातून निघणार्‍या लहरी बहुतकरून आवेगपूर्ण
मृत्यूतून आलेल्या असतात. भस्म सांगते, `अज्ञान सोडा. शरीर खरे नाही. त्यापासून मिळणारे सुख खरे नाही. त्यात अडकू नका.'

आ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

आ १. महातपस्वी व महायोगी : 
सतत नामस्मरण करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो. खूप तप केल्याने वाढलेले तापमान कमी करण्यासाठी गंगा, चंद्र, साप यांसारख्या थंडावा देणार्‍या वस्तूंचा शिव वापर करतो, तसेच बर्फाच्छादित कैलास पर्वतावर रहातो.

आ २. रागीट : स्वत: करत असलेले अखंड नामस्मरण शिवाने स्वत:च थांबविल्यास त्याचा स्वभाव शांतच असतो; मात्र नामस्मरणात कोणी विघ्न आणल्यास (उदा. मदनाने विघ्न आणले तसे), साधनेमुळे वाढलेले तेज एकदम बाहेर पडते व ते समोरच्या व्यक्‍तीला सहन न झाल्याने तिचा नाश होतो. यालाच `शंकराने तिसरा डोळा उघडून भस्मसात केले', असे म्हणतात.

आ ३. दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास तयार असलेला : समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी कोणताही देव त्याचा स्वीकार करण्यास पुढे येईना. तेव्हा शिवाने हालाहल प्राशन केले व जगाला विनाशापासून वाचविले.

आ ४. सहज प्रसन्न होणारा (आशुतोष)

आ ५. देव व दानव दोघेही उपासक असलेला : बाणासुर, रावण वगैरे दानवांनी विष्णूचे तप केले नाही किंवा विष्णूनेही कोणा दानवाला वर दिला नाही; पण त्यांनी शिवाची उपासना केली व शिवाने त्यांना वर दिला.

आ ६. भुतांचा स्वामी : शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.

कार्य

अ. विश्‍वाची उत्पत्ती :
 शिव-पार्वतीला जगाचे आई-वडील म्हटले जाते. संहाराच्या वेळीच नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण शिव निर्माण करतो. तो संकल्पाने विश्‍वाची उत्पत्ती करतो.

आ. जगद्‌गुरु : `ज्ञानं इच्छेत् सदाशिवात् । मोक्षं इच्छेत् जनार्दनात् ।', म्हणजे शिवापासून ज्ञानाची व जनार्दनापासून (विष्णूपासून) मोक्षाची इच्छा करावी. शिवाच्या मस्तकातून ज्ञानगंगा सतत वहात असते.

इ. त्रिगुणातीत करणारा : सत्त्व, रज व तम या तिघांना, म्हणजेच अज्ञानाला शंकर एकत्रितपणे नष्ट करतो.

उपासना


अ. भस्म लावणे

अ १. त्रिपुंड्र :
 त्रिपुंड्र म्हणजे भस्माचे आडवे तीन पट्टे. या तीन पट्ट्यांचा भावार्थ म्हणजे ज्ञान, पावित्र्य व तप (योगसाधना), तसेच शिवाचे तीन डोळे.

आ. रुद्राक्षधारण : शिवपूजा करतांना गळयात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी.

बेलाचे महत्त्व

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील अनाहत(सूक्ष्म) नादातील, अशी दोन तर्‍हेची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके व वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके, अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहातात. कोवळे बिल्वपत्र आहत (नादभाषा) व अनाहत (प्रकाशभाषा) ध्वनी एक करू शकते. तीन पानांतून एकत्र येणारी शक्‍ती आपल्याकडे यावी यासाठी बिल्वपत्र वहातांना पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवतात. या तीन पवित्रकांच्या एकत्रित शक्‍तीने त्रिगुण कमी होण्यास मदत होते.

महाशिवरात्री
माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्‍त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी काताचा संकल्प करावा. सायंकाळी शास्त्रोक्‍त स्नान करावे. भस्म व रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावी. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ व मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वत:च्या मस्तकावर ठेवावे क्षमायाचना करावी. चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात. त्यांना `यामपूजा' म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, धोत्रा, आंबा व बेल यांची पत्री वहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावे. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. (पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते.) ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्‍ती करावी. बारा, चौदा किंवा
चोवीस वर्षे कात केल्यावर त्याचे उद्यापन करावे. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, अध्यात्मशास्त्र - खंड ४४ `शिव')
शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृतींविषयी सनातनच्या साधकांना ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळे उपासकाला त्या देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यास मदत होते. शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी सनातनच्या साधकांना ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान पुढे तक्‍त्यात दिले आहे. या व यांसारख्या विविध कृतींमागील शास्त्र सनातनची ग्रंथमालिका `धर्मशास्त्र असे का सांगते ?' यात दिले आहे.
टीप १ - महाशिवरात्रीच्या दिवशी सोडून अन्य प्रसंगी शिवाला केवडा वहात नसल्याचे सांगितले आहे. असे असतांना शिवाच्या उपासनेत केवड्याच्या गंधाची उदबत्ती व अत्तर वापरावे, असे येथे सांगितले आहे. यामागील
शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आहे - `केवड्यामध्ये ज्ञानलहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता जास्त असते. केवडा ज्ञानशक्‍तीच्या स्तरावर मारक रूपी कार्य करत असल्याने त्याला पूर्णत: लयकारी म्हटले आहे. पूजाविधी हा
लयकारी शक्‍तीशी संबंधित नसल्याने शक्यतो शिवाच्या पूजेत केवडा वापरत नाहीत; परंतु `वाईट शक्‍तींच्या त्रासांच्या निवारणाचा उपाय' म्हणून मात्र केवड्याच्या पानाचा उपयोग केला जातो. या दृष्टीने केवड्याच्या
गंधाची उदबत्ती व अत्तर वापरण्यास सांगितले आहे.' - (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.८.२००५, सकाळी १०.४४)


 


शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्याची पद्धत

शृंगदर्शन म्हणजे नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे.
शृंगदर्शनाची योग्य पद्धत
वामहस्ती वृषण धरोनि । तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि ।। - श्री गुरुचरित्र, ४९.४४
सविस्तर अर्थ : नंदीच्या उजव्या बाजूला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) व अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावेत. दोन्ही शिंगे व त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे. शृंगदर्शनाचा भावार्थ नंदीच्या वृषणाला हात लावणे म्हणजे, कामवासनेवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. शिंग हे अहंकार, पौरुष व क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे, अहंकार, पौरुष व क्रोध यांवर ताबा ठेवायला शिकणे.
शृंगदर्शनाचे फायदे 
१. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज पेलवता येणे : `शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍तीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍तीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍तीची सात्त्विकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍तीशाली लहरी पेलवणे व्यक्‍तीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यांसारखे त्रास होऊ शकतात.'

२. शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍तीचा झोत अधिक प्रमाणात कार्यरत होणे : `उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने तयार होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर
अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग व तीकाता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून
येणारा शक्‍तीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो.'

३. `अशा प्रकारे केलेल्या मुद्रेमुळे शक्‍तीची स्पंदने संपूर्ण शरिरात पसरतात.' - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 


पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहाणे

पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची पद्धत
शिवाकडून येणार्‍या शक्‍तीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला थेट शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍तीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी जास्त नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्‍तीने पिंडीचे दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहावे.
(वरील तत्त्वानुसार श्रीविष्णु वगैरे देवतांच्या देवळांत देवतेची मूर्ती व तिच्यासमोर असणारी कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहून / बसून देवतेचे दर्शन घेऊ नये, तर कासवाच्या प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून दर्शन घ्यावे.)
५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी असलेल्या भक्‍तात देवाकडून येणार्‍या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता असते व त्यामुळे त्या लहरींचा त्याला त्रास होत नाही. अशा भक्‍ताने देवाचे दर्शन समोरूनच घ्यावे. यामुळे त्याला देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी सहजपणे ग्रहण करता येतात.

 


सनातनच्या साधिकेने बिल्वपत्राचे केलेले `सूक्ष्म-परीक्षण'

१. `बिल्वपत्राकडे बघितल्यावर ते त्रिगुणात्मकतेचे प्रतीक असल्याचे जाणवले.
२. शिवतत्त्वाची अनुभूती : बिल्वपत्रातून खूप थंड लहरी येत होत्या. बिल्वपत्रामध्ये शांतीची स्पंदने जाणवत होती, तर त्याच्या बाजूच्या भागातून शक्‍तीची ऊर्जात्मक स्पंदने जाणवत होती. या दोन्ही अनुभूती बिल्वपत्रातील शिवतत्त्वामुळे आल्या.
३. बिल्वपत्रामुळे ध्यान लागण्यास मदत होणे : बिल्वपत्राच्या देठातून चैतन्याची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती व त्यामुळे ध्यान लागण्यास (मन एकाग्र होण्यास) मदत होत असल्याचे जाणवले.
४. अनाहत नादाची अनुभूती येणे : माझ्या मनाला अनाहत नादाची जाणीव होत होती व तो नाद सूक्ष्मातून ऐकूही येत होता.' - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


 


सनातन-निर्मित `शिवाची सात्त्विक नामपट्टी'

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे व त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी किनार यांनी युक्‍त असलेल्या त्या त्या देवतेच्या नामपट्ट्या सनातन बनवते. या नामपट्ट्या त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक आकर्षित व प्रक्षेपित करतात. शिवासहित विविध देवतांच्या मिळून ८० हून अधिक नामपट्ट्या आतापर्यंत सनातनने तयार केल्या आहेत.

 

 


महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाने ज्ञान देणे

`महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतो. त्यामुळे अनेक जीव त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.

- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ४.२.२००५, दुपारी १.२५ ते २.५७)
शिवपिंडीची कार्ये

अ. ज्ञान, भक्‍ती व वैराग्य या लहरींचे प्रक्षेपण करणे :
 शिवपिंडीतून सत्त्वप्रधान ज्ञानलहरी, रजोप्रधान भक्‍तीलहरी व तमप्रधान वैराग्याच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. महाशिवरात्रीला हे प्रक्षेपण ३० टक्क्यांनी वाढते.

आ. चैतन्य, आनंद व शांती या सूक्ष्म-लहरींचे प्रक्षेपण करणे : शिवपिंडीतून चैतन्य, आनंद व शांती या सूक्ष्म-लहरींचे प्रक्षेपण होत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी हे प्रक्षेपण २५ टक्के जास्त प्रमाणात होते. त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेणार्‍यांचे सूक्ष्म-देह शुद्ध होऊन त्यांची आवश्यकतेनुसार सूर्य किंवा सुषुम्ना नाडी जागृत होते. तसेच त्याच्या देहांची सत्त्वगुण व चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शिवपिंडीत असलेल्या शिवाच्या निर्गुण तत्त्वामुळे व प्रक्षेपित होणार्‍या शांतीच्या लहरींमुळे शिवपिंडीजवळ गारवा जाणवतो आणि मन शांत होते.

इ. दर्शन घेणार्‍या जिवाला आवश्यकतेप्रमाणे तारक-मारक तत्त्व मिळणे : 
शिवपिंडीत शिवाचे निर्गुण व निर्गुण-सगुण तत्त्व आणि तारक व मारक तत्त्व यांचा संगम झालेला असतो. त्यामुळे दर्शन घेणार्‍या जिवाला आवश्यक ते तत्त्व मिळते. शिवपिंडीतून मारक शक्‍ती प्रक्षेपित होतांना तेथील तापमान वाढते व आनंद जाणवू लागतो, तसेच तारक शक्‍ती प्रक्षेपित होतांना वातावरण शीतल असते व आनंद आणि शांती यांचा अनुभूती येते.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी २.५० ते ३.४४)

शिवाने विश्रांती घेण्याची वेळ म्हणजे `महाशिवरात्री' 
भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी व देवता यांच्यामध्ये एक वर्षाचे अंतर आहे. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)

महाशिवरात्रीला उपासना केल्यामुळे वाईट शक्‍तींचा दाब कमी होणे 
भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्‍वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्या वेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्‍तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्‍तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम आपल्याला म्हणावा तितका जाणवत नाही.' - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)
प्रदक्षिणा 
शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्हणजे नाला जातो, त्याला सोमसूत्र म्हणतात. प्रदक्षिणा घालतांना डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी ऊर्फ नहाळ (शाळुकेचा पुढे नेलेला स्रोत) असते, तेथपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. हा नियम शिवलिंग जर मानवस्थापित किंवा मानवनिर्मित असेल तरच लागू असतो; स्वयंभू लिंगास तसेच चल लिंगास (घरातील लिंगास) हा नियम लागू नाही. शाळुंकेच्या स्रोताला ओलांडत नाहीत, कारण तेथे शक्‍तीस्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती व पाच अंतस्थ वायू यांवर विपरीत परिणाम होतो. देवदत्त व धनंजय वायू आखडतात. मात्र ओलांडतांना स्वत:ला आवळून ठेवले, म्हणजे नाड्या आखडल्या, तर परिणाम होत नाही. पन्हाळी ओलांडतांना आपल्या पायाची घाण तिच्यात पडली, तर तीर्थ म्हणून ते पाणी प्राशन करणारे भाविक आजारी पडतील; म्हणून पन्हाळी ओलांडत नाहीत, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटते !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शिव')

 


महानंदीच्या आशीर्वादामुळे साधकाला शिवाकडून ज्ञान मिळणे

शिवाबद्दल सूक्ष्म-ज्ञान प्राप्‍तकते साधक श्री. राहुल कुलकणी यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

मनातील प्रश्‍न : मला ज्ञान कोण देतो व का ?
आतून मिळालेले उत्तर : तुला शिवाकडून ज्ञान मिळत आहे; कारण तू मागील काही जन्मांपूर्वी महानंदीची सेवा केली होतीस. त्या वेळी महानंदीने `तुला शिवाकडून ज्ञान मिळेल', असा आशीर्वाद दिला होता. नम्रता, लीनता व शरणागत भाव ज्यात असतो तो नंदी, तर नंदीचे मारक रूप म्हणजे महानंदी !

मनातील प्रश्‍न : नंदी व महानंदी यांमध्ये फरक काय ?
आतून मिळालेले उत्तर : नंदी म्हणजे जो शिवाच्या पुढे उभा आहे व ज्याच्यामध्ये नम्रता, लीनता आणि शरणागती हा भाव असतो, तर महानंदी म्हणजे नंदीचे मारक रूप होय.

ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ व महानंदीच्या आशीर्वादामुळे शिवाकडून ज्ञानप्राप्‍ती होणे
मनातील प्रश्‍न : 
हे ज्ञान मला देण्याचे कारण काय ?
आतून मिळालेले उत्तर : तुला ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ असून मागील काही जन्मांपूर्वी तू महानंदीची सेवा केली होतीस. त्याबद्दल तुला मिळालेल्या अनेक आशीर्वादांपैकी एक म्हणजे भगवान शिवाकडून तुला होत असलेली ज्ञानप्राप्‍ती. तुला शिवाकडून मिळालेले बाकीचे वर काळानुसार सांगीन.

गुरूंनी जिवाला आवश्यक ते ज्ञान देऊन त्या माध्यमातून ईश्‍वराकडे नेणे
मनातील प्रश्‍न : 
मला युद्धाच्या संदर्भात किंवा धर्माच्या संबंधातच ज्ञान का मिळते ?
आतून मिळालेले उत्तर : `प्रत्येक जिवाची आध्यात्मिक उन्नती कशामध्ये आहे', हे गुरुच ठरवत असतात. त्यानुसार प.पू. डॉक्टर त्या जिवाला (म्हणजे जीवात्मा अवस्थेत) ते ते ज्ञान देऊन त्या माध्यमातून कार्य करवून घेतात व ईश्‍वराकडे नेतात.

नामाची व नामाशी संबंधित असलेल्या देवतेची निर्मिती `ॐ' मधून झाली असल्यामुळे वेगवेगळे नामजप एकच असल्याचे वाटणे
मनातील प्रश्‍न :
 प्रत्येक नामजप हा वेगवेगळा नसून सर्व नामजप एकच आहेत, असे वाटण्याचे कारण काय ?
आतून मिळालेले उत्तर : प्रत्येक नामजपाची, तसेच नामाशी संबंधित असलेल्या देवतेची निर्मिती `ॐ' मधूनच झालेली असल्यामुळे हे वेगवेगळे नामजप एकच आहेत.

मनातील प्रश्‍न : प्रत्येक जिवामध्ये `ॐ' आहे, म्हणजे काय ?
शिव : प्रत्येक जिवाच्या अंत:करणातील अंत:प्रेरणा म्हणजेच `ॐ' होय.

जिवावस्थेतून बाहेर आल्यावर जीवात्म्याला ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ निर्माण होणे
मनातील प्रश्‍न : 
जीवात्म्याला ज्ञानप्राप्‍तीची इच्छा का निर्माण होते ?
आतून मिळालेले उत्तर : ज्या वेळी जीवात्मा जिवावस्थेतून बाहेर येतो, म्हणजेच तो मायेची बंधने तोडून बाहेर येतो, त्या वेळी त्याला ईश्‍वराकडे जाण्याची ओढ निर्माण होते. ईश्‍वरासंबंधी तसेच ईश्‍वराने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंविषयी त्याला ओढ निर्माण होते. `त्याच्या मनात केवळ `ईश्‍वरप्राप्‍ती करणे' हीच इच्छा असल्याने त्याचेच ज्ञान प्राप्‍त व्हावे', असे त्याला वाटते. त्याच जिज्ञासेपोटी तो प्रत्येक गोष्टीतील ज्ञान प्राप्‍त करण्याचा प्रयत्‍न करतो.

ईश्‍वरी ज्ञानाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी जिवाने ईश्‍वरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास व गुरुसेवा करून ज्ञान प्राप्‍त करण्याचा प्रयत्‍न करणे आवश्यक असणे, त्यामुळे सूक्ष्म-ज्ञानरूपी चैतन्याचा, तसेच ग्रंथांच्या माध्यमातून संतांच्या संकल्पांतील चैतन्याचा त्या जिवाला लाभ होऊन तो जीव ईश्‍वराकडे ओढला जाणे

मनातील प्रश्‍न :
 ईश्‍वराकडे वळलेला जीव पुन्हा मायेकडे ओढला जाणार नाही, याची शाश्वती काय ?
आतून मिळालेले उत्तर : अशा जीवात्म्याला दोन्ही गोष्टींविषयी ज्ञान मिळण्यास सुरुवात होते, उदा. ईश्‍वराने केलेल्या मायेच्या व्यावहारिक व ईश्‍वरी तत्त्वाच्या ज्ञानाचे त्याला मार्गदर्शन होते. या ज्ञानानुसार जीवात्मा पुन्हा मायेतील गोष्टींमध्ये अडकू शकतो किंवा ईश्‍वराकडेही जाऊ शकतो. याच टप्प्यातून पुढे जाणे महत्त्वाचे असते. या अवस्थेत ईश्‍वरी ज्ञानाचा लाभ जास्तीतजास्त व्हावा; म्हणून जिवाने ईश्‍वरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे व गुरूंच्या पाद्यपूजनाचा अभ्यास (गुरुसेवा) करून त्याचे ज्ञान प्राप्‍त करण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. त्यानुसार प्रयत्‍न केल्यास अशा जिवाला सूक्ष्म-ज्ञानरूपी चैतन्य, तसेच ग्रंथांच्या माध्यमातून संतांच्या संकल्पातील चैतन्याचा लाभ होतो व तो जीव ईश्‍वराकडे ओढला जातो. हेच चैतन्य त्याच्या अंतर्यामी विराजमान होते. (श्री. राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून, ५.१२.२००५, सकाळी ११.३० ते १२)
 


साधकांच्या अनुभुति
 

शिवतत्त्वाशी संबंधित अनुभूती
`बिंदू, चांदणी, तारे, ज्योत व काजवे दिसणे, म्हणजे शिवतत्त्वाची अनुभूती येणे. या तेजतत्त्वाच्या अनुभूती आहेत.
१. बिंदू : हा शिवतत्त्व दर्शवतो.
२. चांदणी : हिची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. ही शिवाची शीतलता दर्शवते.
३. तारा : याची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. हा शिवाची शीतलता तेजस्विता दर्शवतो. तारा हा ब्रह्मतत्त्वही दर्शवतो.
४. ज्योत : हिची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. ही शिवाची शांती दर्शवते. ही आत्मानुभूतीची दर्शक आहे.
५. काजवा : याची उत्पत्ती पांढर्‍या बिंदूतून आहे. हा शिवाची तेजस्विता प्रखरता दर्शवतो.' - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

शिवाची मानसपूजा करतांना हिमालयातील कैलास पर्वतावर बसून शिवपूजा करत असल्याचा भाव ठेवल्यावर स्वत: शिव असल्याचे वाटून मन निर्विचार होणे
१२.८.२००६ रोजी पहाटे जाग आल्यावर मी शिवाची मानसपूजा करून शिवाचा नामजप करण्यास सुरुवात केली. त्या वेळी `मी हिमालयातील कैलास पर्वतावर बसून शिवपूजा करत आहे', असा भाव ठेवून मानसपूजा केल्यावर माझे ध्यान लागून `मी शिव आहे', असे मला वाटले. तेव्हा माझे मन निर्विचार झाले होते. - श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी, सांगली

मच्छिंद्रनाथांच्या उपासनास्थळी जातांना ते दत्तोपासक असूनही `आज शिवतत्त्वाचा लाभ होणार', असा विचार मनात का आला, ते लक्षात येणे, तेथे त्रिशूळ दिसणे व तेथे सर्वत्र व्यापून असलेल्या ॐकारात स्वत:विलीन झाल्याचे जाणवणे 
९.९.२००६ रोजी मच्छिंद्रनाथांच्या उपासनास्थळी जाण्यास निघतांना माझा `महामृत्यूंजयाचा' मंत्रजप आपोआप सुरू झाला. `आज मला शिवतत्त्वाचा लाभ होणार आहे', असा विचार माझ्या मनात आला; मात्र `नवनाथ हे दत्तोपासक आहेत, तर मग शिवतत्त्वाचा लाभ कसा होणार', असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. देवळात पोहोचल्यावर तेथील माहिती वाचतांना कळले की, या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकरराने त्यांना दर्शन व आशीर्वाद दिला होता. त्यामुळे या क्षेत्री शंकराचेही अस्तित्व आहे. यामुळे `माझ्या मनात आलेला विचार योग्यच होता', हे लक्षात आले. देवळामध्ये प्रवेश केल्यानंतर माझे मन निर्विचार झाले. नंतर मला डोळयासमोर `त्रिशूळ' दिसला व ॐ काराचा जप मनात सुरू झाला. `तेथे सर्वत्र ॐ कारच व्यापून आहे', असे जाणवले व मी त्या ॐ कारात विलीन होत असल्याचे जाणवले. - श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, कुडाळ.

ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करत असतांना गांधीलमाशांनी त्रास देणे व प्रार्थना केल्यावर गांधीलमाशा निघून जाणे
महाशिवरात्रीच्या दिवशी विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावले होते. तेथे सर्व साधकांना नामजप व प्रार्थना यांची आठवण करून देणे आणि ग्रंथ वितरण करणे, अशा सेवा माझ्याकडे होत्या. त्या वेळी ५ ते ६ गांधीलमाशा तेथे येऊन फक्‍त माझ्याभोवतीच फिरू लागल्या. त्यातील १ गांधीलमाशी मला जोरात चावली. मी ग्रंथप्रदर्शन केंद्राच्या बाहेर पडल्यावर त्या निघून जात; परंतु मी ग्रंथप्रदर्शन केंद्राच्या आवारात प्रवेश केल्यावर त्या पुन्हा माझ्याभोवती फिरू लागत. मला त्या सेवा करू देत नव्हत्या. त्यानंतर मी प.पू. डॉक्टर व उपास्यदेवता यांना प्रार्थना केली, `या माशा मला चावल्या, तर सहन करण्याची शक्‍ती तुम्ही मला द्या.' त्यानंतर मी गांधीलमाशांना प्रार्थना केली, `मला गुरुसेवा करायची आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. मी सेवा करणारच आहे.' अशी प्रार्थना केल्यानंतर त्या अचानक नाहीशा झाल्या. त्यानंतर त्या पुन्हा आल्या नाहीत व पूर्ण दिवसभर सेवा करतांना मला कोणताही त्रास जाणवला नाही. - सौ. तेजश्री पावसकर, अंधेरी, मुंबई.

ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी विभूती फुंकरल्यानंतर जिज्ञासूंची गर्दी वाढणे
महाशिवरात्रीच्या दिवशी कॉटनग्रीन येथील शिवमंदिरात साधकांनी ग्रंथप्रदर्शन लावले होते; परंतु तेथे कोणीही जिज्ञासू येत नव्हते. ग्रंथ वितरण केंद्रावर विभूती फुंकरल्यावर पुढील १० ते १५ मिनिटे जिज्ञासूंची गर्दी वाढत असल्याचे २-३ वेळा अनुभवले. - कु. स्वाती बळे, वडाळा, मुंबई

आश्रमात खड्डा खणत असतांना तेथून शक्‍ती व चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवणे, ती शक्‍ती शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीप्रमाणे जाणवणे व आश्रमाच्या कोणत्याही भागात खड्डा खणल्यास अशीच शक्‍ती जाणवणार असल्याचे जाणवणे 
आश्रमातील स्वागतकक्षाच्या कोपर्‍यात दोन ते अडीच फूट खोल खड्डा खणायचा होता. ती सेवा मी करत असतांना दीड फूट खोल खड्डा खणल्यावर मला तेथील मातीतून शक्‍ती व चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.
जसजसा खड्डा खोल खणत गेलो, तसतसे प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीचे प्रमाण वाढू लागले. त्या वेळी माझी सेवा भावपूर्ण होत होती. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जशी शिवाच्या पिंडीतून शक्‍ती प्रक्षेपित होते, त्याप्रमाणे शक्‍ती बाहेर पडत असल्याचे मला जाणवत होते. `आश्रमाच्या कोणत्याही भागात खड्डा खणल्यास, तेथे अशीच शक्‍ती जाणवेल', असे मला जाणवले. - श्री. जगदीश पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


 


हिंदूंनो, आपल्या `शिव' देवतेची विटंबना रोखा !

भक्‍तांना असह्य करणारी शिव-पार्वती यांची `हुसेन'कृत विटंबना !


नग्न  पार्वती

डोके नसलेला शिव व अर्धनग्न पार्वती 

नग्न गंगा व यमुना
शिव म्हणजे मंगलमय, कल्याणस्वरूप सदाशिव तत्त्व ! अखिल हिंदूंच्या भावभक्‍तीचे प्रतिक असलेले सर्वशक्‍तीमान दैवत ! शैवभक्‍तीची किर्ती त्रैलोक्यात व सप्‍तलोकांत दिगंत आहे; पण भूलोक त्याला अपवाद आहे. भूलोकावर शिव-पार्वती यांची नग्न चित्रे रेखाटली जातात. हे सर्व अश्लील व बिभत्स चाळे शिवभक्‍तीचा महिमा गाणार्‍या भारतवर्षात चालतात. गावोगावी शैवमंदिरे व पदोपदी शिवभक्‍त असलेल्या, बारा ज्योतिर्लींगांचे वास्तव्य असलेल्या
पुण्यभू भारतात म.फि. हुसेन यांच्यासारखे हिंदुद्वेष्टे चित्रकार कुंचल्याच्या साहाय्याने हिंदूंच्या भावभक्‍तीच्या चिंधड्या उडवतात. हिंदूंच्या भावभक्‍तीची ही विटंबना वर्षानुवर्षे सुरू रहाते, तेव्हा हिंदु मनावरील अपमानाचा हा घाव आणखी दुखरा होतो. भक्‍तांना असह्य करणारी शिव-पार्वती यांची ही `हुसेन'कृत विटंबना !

ख्रिस्त्यांकडून हिंदु धर्माबाबत अमेरिकेत केला जाणारा अपप्रचार

हिंदूंनो, शिवाविषयी अभद्र प्रचार राजरोसपणे सुरू असतांना शिव प्रसन्न होईल का ?

शिवाच्या जननेंद्रियाची पूजा करणारे हिंदू - एक प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र
अमेरिकेतील प्रख्यात गणल्या गेलेल्या वृत्तपत्रांपैकी एक `न्यूयार्क टाईम्स' या वृत्तपत्राने अमरनाथ यात्रेकरूंबाबत विचार मांडतांना म्हटले आहे, `हिंदु लोक (शिवाच्या) जननेंद्रियाची पूजा करण्यासाठी अमरनाथाची यात्रा करतात.' याबाबत आपली प्रतिक्रिया काय ?, असे विचारल्यावर न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रतिनिधीने सांगितले की, शिवाला लयाची देवता मानले जाते. लयाची देवता समजल्या जाणार्‍या अमरनाथ येथील शिवलिंगाची, म्हणजे शिवाच्या जननेंद्रियाची हिंदु लोक पूजा करतात. तेथील (अमेरिकेतील) जनतेला शिवाची ओळख अशीच करून देण्यात आली असून, या देवाला त्यांच्यासमोर त्याप्रमाणेच सादर केले जात आहे.
(संदर्भ : पोप्स, सेंट्स, कार्डिनल्स, आर्चबिशप्स, बिशप्स, पूर्णत: सुधारित द्वितीय आवृत्ती, पृष्ठ ३. लेखक : मानोज रखित)

हिंदूंच्या देवतांबाबत संकेतस्थळावरून केला जाणारा अपप्रचार
शिव हा नशेत रहाणारा, शिवलिंग म्हणजे शिवाचे वासनापूर्तीसाठी ताठरलेले लिंग, शक्‍ती ही वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणारी, तर काली ही दुष्ट आणि रक्‍तपिपासू देवता !
http://religion-cults.com/Eastern/Hinduism/hindu11.htm या संकेतस्थळावर हिंदूंच्या देवतांबाबत लिहिलेली माहिती www.IndiaCause.com या संकेतस्थळाने प्रकाशात आणली आहे. आतापर्यंत ७१ लाखांपेक्षा अधिक जणांनी या संकेतस्थळाला भेट दिलेली आहे. (संदर्भ : पोप्स, सेंट्स, कार्डिनल्स, आर्चबिशप्स, बिशप्स, पूर्णत: सुधारित द्वितीय आवृत्ती, पृष्ठ ४. लेखक : मानोज रखित)


`शिव' देवता चित्रपटातील नटाप्रमाणे चितारणे


`शिव' देवता रांगोळीवर मोटारसायकल चालवतांना चितारणे 


`शिव'भक्‍तांनो धर्मशिक्षण घ्या व धर्माभिमानी व्हा !


 


`शिव'भक्‍तांनो धर्मशिक्षण घ्या व धर्माभिमानी व्हा !

महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम समितीकडून भाडेवाढ करून जादा गाड्या (दैनिक सनातन प्रभात, १६.२.२००७)

मुसलमानांना हज यात्रेसाठी विमानसेवेत कोट्यवधी रुपयांची सवलत, तर हिंदूंना धार्मिक यात्रेसाठी २५ टक्के भाडेवाढ !
हिंदूंनो, तुमच्या धार्मिक यात्रांवर `जिझिया' कर लावणार्‍या औरंगजेबरूपी राज्यकर्त्यांना हद्दपार करा !
पुणे, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - महाशिवरात्रीच्या निमित्ताने बनेश्वर, निळकंठेश्वर व सोमेश्वरवाडी या ठिकाणी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे परिवहन सेवेच्या या निर्णयामुळे भाविकांत उत्साह निर्माण होत असतांनाच प्रशासनाने निळकंठेश्वर येथील बससेवेच्या बदल्यात २५ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेऊन भाविकांच्या उत्साहावर पाणी सोडले आहे. (हज यात्रेकरूंना हिंदूंच्या पैशातून विमानसेवेत कोट्यवधी रुपयांची सवलत मिळते, तर हिंदूंचे राष्ट्र असलेल्या भारतात हिंदूंच्या धार्मिक यात्रांना २५ टक्के भाडेवाढ केली जाते. हिंदूंनो या विषमतेच्या विरोधात आपण कधी आवाज उठवणार ? - संपादक) या जादा आकारणीमागचे कारण विचारले असता जनतेसाठीच्या दररोजच्या सेवेतील गाड्या काढून घ्याव्या लागत असल्याचे (विशेष बससेवा) कारण प्रशासनाने सांगितले. स्वागरेट स्थानकाहून पहाटे ३ वाजता निळकंठेश्वर येथे, तर ६.३० वाजता बनेश्वर येथे भाविकांना जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातील, तसेच सकाळी ६.३० वाजता महापालिका भवन येथून सोमेश्वरवाडीसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवलिंगाच्या दुग्धाभिषेकाच्या धार्मिक कृतीकडे आध्यात्मिक नव्हे, तर मानसिक स्तरावर पहाणारे मंदिरांचे विश्वस्त !
महाशिवरात्रीला मुंबईतील एका शिवमंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक करतांना दूध अत्यंत थोडक्या प्रमाणात घालावे व उरलेले दूध भाविकांना तीर्थ म्हणून वाटण्यासाठी व्यवस्थापनाकडे जमा करावे', असे भाविकांना सांगण्यात आले. शिवपिंडी हे शिवतत्त्वाचे स्थूल प्रतीक आहे. त्यात शिवतत्त्व आकृष्ट होत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी हे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. पिंडीवर दुग्धाभिषेक केल्यावर त्यात सूक्ष्म शिवतत्त्व मिसळते. असे दूध त्या शक्‍तीने भारित होते. त्यामुळे त्याला तीर्थ असे संबोधन प्राप्‍त होते. मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍यांनी असे तीर्थ जनतेला वाटायला हवे. त्यातून भाविकांना शिवतत्त्वाचा लाभ होईल. त्याऐवजी पिंडीवर न वाहिलेले दूध भाविकांना वाटणे म्हणजे तीर्थ देणे नव्हे. अशा दुधाला अध्यात्मशास्त्रदृष्ट्या तीर्थ म्हणता येत नाही. ते मंदिरात आलेल्या भाविकांना दूध वाटणे होईल. अशा रीतीने विचार केल्यास उद्या कोणी शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करणेही चुकीचे आहे, असे म्हणू लागेल. मंदिराच्या व्यवस्थापकांनी धार्मिक कृतींकडे अशा प्रकारे मानसिक स्तरावर पाहू नये.

सनातनच्या साधकांनो, या जन्मीच `ईश्‍वरप्राप्‍ती' (मोक्षप्राप्‍ती) हे ध्येय उराशी बाळगण्यासाठी प्रथम ईश्‍वराचे भक्‍त होण्याचा कसोशीने प्रयत्‍न करा !
भगवंताचे विष्णुलोक व कैलास येथील अनेक भक्‍त ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेला मदत करणार असणे व सन २०२३ च्या गुरुपौर्णिमेला प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी प्राप्‍त करून मोक्षाला जाणार असणे : भगवंताचे विष्णुलोक व कैलास येथील अनेक भक्‍त २०१० ते २०२३ गुरुपौर्णिमा या कालावधीत ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात सूक्ष्मातून मदत करणार आहेत. २०२३ सालाच्या गुरुपौर्णिमेला ईश्‍वरी नियोजनानुसार विष्णुलोक व कैलास येथील भक्‍त प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी प्राप्‍त करून मोक्षाला जातील. - विश्वनाथ देवता (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून, ४.७.२००६ पहाटे ३.४०)


अंनिसवाल्यांना याबाबत काय म्हणायचे आहे ?
कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील `अम्मिभावी' या गावात एक चमत्कार होत असतो. तेथील एका शेतकर्‍याचा बैल दर अमावास्या व पौर्णिमा या तिथींना न चुकता गावातील तळयात स्वत:हून स्नान करतो व ओलेत्याने
श्री शिवबसवेश्वर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालतो. नंतर मंदिरात प्रवेश करून नंदीच्या मूर्तीच्या शेजारी महादेवाच्या पिंडीकडे पहात सायंकाळपर्यंत बसतो. प्रतिपदा ते चतुर्दशीपर्यंत तो गावात व शिवरात फिरतो. पौर्णिमा व
अमावास्या या तिथी त्याला कशा समजतात आणि प्रदक्षिणा व देवळात जाऊन एकचित्ताने बसावयाचे ज्ञान त्याला कोणत्या विधात्याने दिले आहे, हे आश्चर्यच आहे. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी येत्या अमावास्येला किंवा
पुढील पौर्णिमेला या धारवाड तालुक्यातील गावास भेट द्यावी व हा चमत्कार स्वत: पहावा. - श्री. मंगेश सरदेशपांडे, बेळगाव

 शिव हा स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाशी असून तो विश्‍वालाही प्रकाशित करतो !


 


ध्वनिचित्रपट

शिवविषयक आध्यात्मिक माहिती


शृंगदर्शन कसे घ्यावे?


शिवपूजेत काय असावे व काय नसावे?


शिवाला बेल का व कसा वहावा?


शिवपूजेला कुठे बसावे?


शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री का घालावी?


Read more...

दत्तजयंती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. त्या वेळी देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न अयशस्वी झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात.

दत्तजयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत होत असतो.

दत्ताचा नामजप : श्री गुरुदेव दत्त ।

फायदे
१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्‍ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्‍तींशी लढू शकतो.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्‍ती मिळते.
३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्‍तींचा त्रास अल्प होतो.
४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, २.११.२००५, रात्री ८.३०)

लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे
१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्‍या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्‍तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.
४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.
५. नामजप करणार्‍या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. (३०.९.२००६, दुपारी २.०७)

पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना

दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व !

विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्‍नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.

समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना

समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्‍यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्‍त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्‍ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्‍त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.

त्याची शक्‍ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्‍त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्‍त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्‍तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात - ब्रह्मतत्त्व (२४.४.२००६ सकाळी ७.३५)

'दत्त'विषयक - आध्यात्मिक माहिती

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/dattajayanti/index.htm

Read more...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत : विठ्ठल

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


तत्त्व
श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य
श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.

तुमच्यातील `भक्‍तीभाव' हा घटक वाढण्यासाठी माझे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, असे श्री विठ्ठलाने सांगणे :
साधकांनो, ईश्‍वरीराज्य आणण्यासाठी तुमच्यात भक्‍तीभाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. जेवढा तुमचा भक्‍तीभाव जास्त, तितक्या लवकर ईश्‍वरी राज्य येईल. त्यामुळे तुमच्यातील `भक्‍तीभाव' हा घटक वाढण्यासाठी माझे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मी साधकांच्या मदतीला सतत धावून येईन.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्‍नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.

भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता
श्री विठ्ठल भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्‍तगण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात.
श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्‍तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्‍तांचा ठाम विश्‍वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्‍तांची दळणे दळली, गोवर्‍या थापल्या व भक्‍ताची सेवा केली.

मूर्तीविज्ञान
काळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.




२. विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती !

विठ्ठल
अ. व्युत्पत्ति : `विठ्ठल शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. कै. राजवाड्यांच्या मते `विष्ठल' शब्दावरून विठ्ठल हे रूप तयार झाले. विष्ठल म्हणजे दूर, रानातील जागा किंवा स्थळ होय. यावरून विठ्ठलदेव म्हणजे रानात असणारा देव, असा त्याचा अर्थ होतो. डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, विष्णु या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप बिट्टी होते आणि या अपभ्रंशापासून विठ्ठल शब्द तयार झाला. विष्णूचा विठ्ठु असा अपभ्रंश आर्य-प्राकृत भाषांच्या नियमानुसार होतो. श्री. चि.वि. वैद्यांचेही असेच मत आहे. कै. विष्णुबुवा जोग यांना `वीचा केला ठोबा' या तुकारामाच्या अभंगाच्या आधारे सांगितलेली व्युत्पत्ति अशी - वि विद् म्हणजे जाणणे किंवा ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती, म्हणून विठोबा म्हणजे ज्ञानमर्ती.

आ. दुसरे नाव : पांडुरंग. विठोबाला पांडुरंग असेही म्हणतात. हे नाव त्याला कसे मिळाले, ते सांगता येत नाही; कारण पांडुरंग हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते पंढरपूर होय, असे डॉ. भांडारकर म्हणतात.' विठ्ठलाची मूर्ती काळया रंगाची असूनही त्याला पांडुरंग (पांढर्‍या रंगाचा) हे नाव कसे, असा काही जणांना प्रश्‍न पडतो. वर दिलेल्या मुद्याखेरीज त्याचे उत्तर असे की, खर्‍या भक्‍ताला सूक्ष्मदर्शनेंद्रियाने ती मूर्ति पांढरीच दिसते. महिन्यातील दोन एकादशांपैकी पहिली विठ्ठलाच्या नावे व दुसरी पांडुरंगाच्या नावे करतात.

विष्णु : व्युत्पत्ती व अर्थ `विष् सतत क्रियाशील असणे, विश् व्यापणे यावरून यास्काने या शब्दावरूनही तो शब्द सिद्ध होतो, असा पर्याय दिला आहे (निरुक्‍त १२.१९).
इतर नावे : विष्णूचे `विष्णुसहस्रनाम' हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. या हजार नामांचा उच्चार करून विष्णूला तुलसीदले किंवा कमळे अर्पण करतात. सर्व नावे विष्णूचीच असली, तरी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात, या नियमानुसार विष्णूच्या या निरनिराळया नावांतून निरनिराळया प्रकारच्या शक्‍ती कार्यरत होतात. एका स्तोत्रपंक्‍तीत म्हटले आहे की, औषध घेतांना विष्णूचे स्मरण करावे. जेवतांना जनार्दनाचे, झोपतांना पद्मनाभाचे, लग्नाच्या वेळी प्रजापतीचे, युद्धाच्या वेळी चक्रधराचे, प्रवासात त्रिविक्रमाचे, मृत्यूच्या वेळी नारायणाचे, वाईट स्वप्न पडल्यास गोविंदाचे, संकटामध्ये मधुसूदनाचे, अरण्यामध्ये नारसिंहाचे स्मरण करावे.

इ. पत्‍नी (शक्‍ती) : देवांच्या पत्‍नी म्हणजे त्यांच्या शक्‍ती होत. या तारक व मारक अशा दोन प्रकारच्या असतात. विठ्ठल हा उत्पत्ती, स्थिती व लय यांपैकी स्थितीचा देव असल्याने त्याच्या दोन्ही शक्‍ती, म्हणजे पत्‍नी, उत्पत्ति व स्थितीशी संबंधित आहेत. राई व रुक्मिणी ह्या विठ्ठलाच्या पत्‍नी होत.
इ १. राई : राई म्हणजे मातीचा कण. तो पृथ्वीच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. (शिरीष म्हणजे राईला आलेले फूल.) राईलाच पद्मावती किंवा पदुबाई म्हणतात. पद्मकोश म्हणजे गर्भाशय.
इ २. रुक्मिणी (रखुमाई) : रुक्मिणी म्हणजे वारूळ किंवा शंखाचा आकार. हेही गर्भाशयाचे प्रतीक असते.

ई. आषाढी एकादशी : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) व वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधि करतात.

उ. पंढरपुरची वारी : हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असे समजले जाते.
(संदर्भ : सनातनतर्फे प्रकाशित ग्रंथ : विष्णु व विष्णूची रूपे)

Read more...