सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील मंत्रांमुळे होणारे फायदे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
शांती करणे


सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील मंत्रांमुळे होणारे फायदे

अ. विधीतील मंत्रांमध्ये साधना व जीवनाचा उद्देश सांगितला आहे. त्यामुळे लिंगदेहावर चैतन्याच्या जोडीला साधना करण्याचाही संस्कार होतो.

आ.या ज्ञानाचे स्मरण मृत्यूपर्यंत व मृत्यूसमयी झाल्यामुळे जिवाचा अहं कमी होण्यास मदत होते.

इ. जिवाच्या मनात सत्चे विचार व जिवाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते.

ई. त्यामुळे पुढचा जन्म घेतांना जिवामध्ये वाईट शक्तींचा प्रतिकार करण्याची उपजतच क्षमता निर्माण होते.

उ. अशा जिवाला गर्भात धारण करणार्‍या मातेलाही प्रसूतीपूर्वी व प्रसूतीच्या वेळी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरांवर त्रास होण्याचे प्रमाण कमी असते. याउलट गर्भातील जिवाच्या सूक्ष्म-देहांवर चैतन्य व साधना यांचे संस्कार झाल्यामुळे मातेला गर्भातील जिवाचा सत्संग लाभतो व आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती येते. (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: