देवळात प्रवेश करण्यापूर्वी कळसाचे दर्शन घेण्यामागील शास्त्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
देवळात दर्शन


`कोणताही जीव जन्माला येतांना गतजन्मीची आध्यात्मिक पातळी सोबत घेऊन येतो. त्यानुसार त्याच्या कुंडलिनीतील आवश्यक ते चक्र जागृत असते किंवा त्या चक्रापर्यंत त्याच्या कुंडलिनीचा प्रवास होेऊन थांबलेला असतो. सत्य, त्रेता व द्वापार या युगांत जिवाचा पहिला वाढदिवस साजरा करतांना त्याला आशीर्वाद देण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत येत असत किंवा जिवाला आशीर्वाद मिळण्यासाठी उन्नतांकडे नेले जात असे. उन्नत जिवाचे औक्षण करून व जिवासाठी अव्यक्‍त संकल्प करून त्याच्या शरीराच्या विविध अवयवांवर अक्षता टाकून त्या त्या ठिकाणी असलेले चक्र जागृत करीत व ज्या चक्रापर्यंत जिवाची उन्नती झालेली असेल, त्याच्या पुढच्या चक्राला आपल्या हाताच्या बोटांत अक्षता घेऊन बोटांनी स्पर्श करीत. त्यामुळे जिवाच्या कुंडलिनीचा पुढील प्रवास सुरू होत असे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पातळीच्या उन्नतांना कोणत्याही जिवाकडे पाहिल्यावर `त्याची आध्यात्मिक उन्नती कोणत्या चक्रापर्यंत झालेली आहे', हे लक्षात येत असे. त्यामुळे त्यांनी केवळ त्या चक्रावर नजर टाकली, तरीही जिवाची उन्नती होत असे.'

संदर्भ : सनातन-निर्मित `धर्म असे का सांगतो ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `देवळात दर्शन कसे घ्यावे ?')

अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा


0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: