`कोट्यवधींच्या मलमूत्राने प्रदूषित झालेली गंगा पवित्र कशी ?', असे विज्ञानवादी म्हणतात !गंगा-यमुनेच्या संगमावर एवढा मोठा जनसमुदाय पाण्यात उतरतो तेव्हा थुंकी, मूत्र, विष्ठा, घाम यांमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याने संसर्ग होऊ शकतो, असे विज्ञानवादी म्हणतात.पवित्र व अस्वच्छ आणि शुद्ध-अशुद्ध यांतील फरक न समजणारे विज्ञानवादी ! तीर्थक्षेत्रांचे पाणी अशुद्ध होते ही मानवनिर्मित चूक असली, तरीही त्याचे पावित्र्य कमी होत नाही ! पवित्र व अपवित्र यांतील फरक सूक्ष्मातील...
Guru Pournima 2013r
Chattrapati Shivaji Maharaj...
Swatantryaveer Vinayak Savarkar
Adi Shankaracharya
Guru Pournima 2013
Read More About Guru Pournima ...More
Chattrapati Shivaji Maharaj
Hindavi swarajyache sansthapak ani adarsh rajyakarta...More
Swantraveer Vinayak Damodar Sawarkar
Swatantryaveer vinayak damodar savarkarancha vijay aso...More
Adi Shankaracharya
Adi Shankkaracharya...More
विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ कसे ?
विज्ञान व अध्यात्मशास्त्र : `विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत; पण सामान्यपणे जड पदार्थ आणि नैसर्गिक घटना यांचे निरीक्षण करून व प्रयोग करून, आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने जे ज्ञान प्राप्त होते, ते क्रमबद्ध व नियमबद्ध केले असता जे शास्त्र निर्माण होते, त्याला विज्ञान म्हणतात.यासंबंधी प्रा. के.वि. बेलसरे यांनी जे विवेचन केले आहे, ते असे - भौतिक वस्तूंचे गुणधर्म व परस्परसंबंध जाणून घेऊन, त्यांतील सामान्य नियम शोधून काढणे व त्या नियमांची तर्कशुद्ध प्रणाली बनवणे, हे विज्ञानाचे कार्य होय. सूक्ष्म निरीक्षण, वर्गीकरण, नियम व...
महाव्रत : एकादशी
मौन, सत्य व मृदु भाषण या वाचिक व्रतांमुळे वैरभाव कमी होतो !
चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो.
पद्मपुराणामध्ये एकादशी या व्रताचे महत्त्व असे सांगितले आहे। अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । कादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।
अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ...
देवळात देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाला प्रदक्षिणा का घालाव्यात ?
देवतेला प्रदक्षिणा घालणे देवतेचे दर्शन घेतल्यानंतर देवतेला प्रदक्षिणा घालावी. देवतेला प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेला आपल्या आठही अंगांसहित, म्हणजेच साष्टांग नमस्कार करण्यासारखेच आहे. प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेच्या साक्षीने एक प्रकारे स्वत:मधील षड्रिपू व अहं यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे व देवतेला अनन्यभावाने शरण येणे. देवळात देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाला प्रदक्षिणा का घालाव्यात ? `देवतेला प्रदक्षिणा घातल्याने प्रदक्षिणामार्गात कार्यरत असलेल्या...
आरतीच्या पूर्वी शंख वाजवतांना पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत
अ. आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा. आ. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी. इ. शंख वाजवतांना डोळे मिटून, `ऊर्ध्व दिशेकडून येणार्या ईश्वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत', असा भाव ठेवावा.ई. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्वास पूर्णत: छातीत भरून घेऊन मग एका श्वासात वाजवावा.उ. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या आवाजाकडे न्यावा व तिथेच सोडावा.संदर्भ : सनातनचा ग्रंथ `आरती कशी...
सूर्यास्ताच्या वेळी आरती करण्यामागील शास्त्र काय ?
सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्वाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने वायुमंडलातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते, तसेच रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीचे प्रमाणही वाढते. या संधीचा फायदा उठवून वाईट शक्ती वातावरणातील आपला संचार वाढवतात. अशा रज-तमात्मक वायुमंडलाचा त्रास होऊ नये, यासाठी आरतीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या नादलहरींतून देवतांच्या लहरींना आवाहन करून त्यांना ब्रह्मांडकक्षेत आणणे आवश्यक असते. आरतीमुळे वायुमंडलात देवतांच्या चैतन्यमय...
आरतीचे महत्त्व
अ. देवतेची स्तुतीपर आरती म्हणण्याने देवता प्रसन्न होणे :आरतीत देवतेची स्तुती व देवतेच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते. देवता स्तुतीप्रिय व कृपाळू असल्याने आरती करणार्यावर ती प्रसन्न होते.आ. आरतीचे रचनाकार उन्नत असल्याने त्यांच्या संकल्पशक्तीचा फायदा मिळणे :बहुतांशी आरत्यांची रचना ही संतांनी व उन्नत भक्तांनी केलेली आहे। उन्नतांचा संकल्प व आशीर्वाद असल्याने, आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही दृष्ट्या लाभ होतो.इ जिवाची सुषुम्नानाडी...
गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे ! - प.पू. डॉ. आठवले
`गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंच्या पूजनाचा दिवस. गुरूंकडून आपल्याला जे मिळाले व जे मिळत आहे, त्याप्रती पूर्ण कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी सनातन हिंदु संस्कृतीच्या निर्देशक असणार्या व गुरु-शिष्य परंपरा जपणार्या सर्व विद्याशाखांमधील साधक आपापल्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात व गुरूंचे पूजन करतात.प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले गुरु-शिष्य परंपरा ही सनातन हिंदु संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. ती सनातन हिंदु संस्कृतीतील ज्ञानदानाच्या व विद्यादानाच्या...
निमंत्रण - गुरुपौर्णिमा महोत्सव - २००८
जाहिर निमंत्रणप.पू. भक्तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सप्रेम नमस्कार,श्री व्यासपूजा व प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रतिमापूजन सोहळा आषाढ पौर्णिमा, कलीयुग वर्ष ५११०, शुक्रवार, १८ जुलै २००८ रोजी साजरा होणार आहे. संस्थेतर्फे या वर्षी भारतात १७६ तर विदेशांत १९ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या सोहळयाला आपण सहकुटुंब उपस्थित राहून अमोल सत्संग व प्रवचने यांचा लाभ घ्यावा, ही विनंती.कार्यक्रमाचे स्वरूप : श्री व्यासपूजा, गुरुपूजन व...
अर्पणाचे महत्त्व
साधनेसाठी हळूहळू आपले तन, मन व धन यांचा त्याग होणे आवश्यक असते. मनाचा त्याग नामस्मरणाने, तनाचा त्याग शारीरिक सेवेने आणि धनाचा त्याग ते अर्पण करून होतो. आपल्या उत्पन्नातील २० टक्के भाग अर्पण करण्याची आपली संस्कृती आहे. दान सत्पात्री द्यायला हवे, अन्यथा देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात. समाजात संतांहून अधिक सत्पात्र कोणीही असू शकत नाही; कारण संत स्वत:च ईश्वराचे सगुण रूप असतात. संतांना दान केल्याने संचित कर्म घटते आणि प्रारब्धभोग भोगण्याची क्षमता वाढते....
`गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'
१. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्यांना `परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात', याची खात्री पटणे :`गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।', याचा अर्थ शिष्याचे परममंगल केवळ गुरुकृपेनेच होते. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले साधक व शिष्य यांनी प्रत्यक्ष गुरुकृपा अनुभवलेली असल्याने त्यांना गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व पटलेले असते. त्यामुळे त्यांना `आपल्या गुरूंसाठी काय करू व किती करू', असे वाटत असते. गुरुकृपेचे वर्णन व महत्त्व हे शब्दातीत...
।। गुरुकृपायोग ।।
गुरुकृपायोगानुसार साधनेतील टप्पे व सर्व योगांमध्ये गुरुकृपायोगाचे महत्त्व येथे देत आहोत.गुरु `गु'कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार व `रु'कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा. शिष्याचे अज्ञान घालवून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे साधना सांगून ती करवून घेतात व अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते (कारण ते प्रारब्धानुसार असते), तर फक्त...
गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते व गुरुकृपा सातत्याने रहाते.तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून `मी काय केले की ती खुष होईल', या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला `माझे' म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून `मी काय केले की ते प्रसन्न होतील', या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक...
गुरूंची आवश्यकता
१. शहरात एखाद्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्वराचा पत्ता गुरुच सांगू शकतात.२. स्वत:ला पोहता येत नसेल, तर नदीपार होण्यासाठी भोपळयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी गुरुरूपी भोपळयाची आवश्यकता असते.३. शिष्याला स्वत:च्या प्रयत्नांनी आपली उन्नती करून घेता येत नाही, असे नाही; पण चांगल्या गुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने शिष्याचा आत्मोन्नतीचा मार्ग सुगम होतो. एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन...
गुरुमंत्राचा अर्थ व महत्त्व
अर्थ : गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, ते गुरूंनी सांगितलेले असते. तन, मन व धन यांचा ५५ टक्क्याहून जास्त भाग अध्यात्मासाठी वाहिला की मगच गुरुमंत्र मिळतो. म्हणूनच कित्येक वर्षे गुरूंच्या सहवासात असलेल्यांची तेवढी पातळी आली नसल्यास गुरु त्यांना गुरुमंत्र देत नाहीत. तीव्र मुमुक्षुत्व असलेल्या साधकाला मात्र लवकर गुरुप्राप्ती होऊ शकते.महत्त्व : आपल्या आवडीच्या देवाच्या नामाचा जप करण्यापेक्षा पुढील कारणांसाठी गुरूंनी सांगितलेल्या नामाचा जप करावा.१. आपल्या उन्नतीसाठी कोणते नाम घ्यावे, हे आपल्याला कळत नाही; ते गुरुच सांगू शकतात.२. आपल्या आवडीच्या देवाच्या मंत्राने...
ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी
एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले होते. त्या राजाशी झालेल्या वार्तालापात त्या राजाने त्याचा देवावर विश्वास नसल्याचे सांगितले. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या राज्याच्या दिवाणखान्यात लावलेले त्याच्या वडिलांचे छायाचित्र बघण्यासाठी मागितले व त्या छायाचित्राच्या काचेवर स्वामी विवेकानंद थुंकले।हे बघताच संतापलेल्या राजाने त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, ``काय झाले ?'' राजाने सांगितले, ``तुम्ही माझ्या वडिलांच्या...
शिक्षक व गुरु यांच्यातील फरक

गुरु करावेत का ?गुरु शिवाय मोक्ष नाही हे कसे ?गुरु आपल्या जीवनात कधी येतात ?शिक्षक व गुरु यांच्यातील फरक काययांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे येथे वाचा गुरुपौर्णिमा शिक्षक ठराविक वेळ व केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवतात, तर गुरु हे चोवीस तास शब्द व शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे...
स्नानानंतर प्राणायाम का करावा ?
पूजकाने स्नान केल्यावर लगेच प्राणायाम करावा. प्राणायाम केल्यामुळे जिवाच्या पंचप्राणांची काही प्रमाणात शुद्धी होऊन जिवाच्या देहात असलेल्या काळया शक्तीचे विघटन होते. तसेच स्नान केल्यामुळे जिवाच्या देहाची सात्त्विकता काही अंशी वाढल्याने प्राणायामाच्या आधारे जिवाला सात्त्विकता जास्त काळापर्यंत टिकवून ठेवणे शक्य होते.सर्वसाधारणत: पूजाविधीच्या विविध कृतींतून जिवासाठी आवश्यक वायूमंडलाची निर्मिती होत असते. त्यामुळे प्राणायाम करण्याची विशेष आवश्यकता नसते....
पूजा कधी करावी ?
स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होण्यासाठी स्नान केल्यावर शक्यतो एका तासाच्या आत पूजा सुरू करावी.स्नान केल्यावर एका तासानंतर स्नानामुळे वाढलेली सात्त्विकता वायूमंडलातून होत असलेल्या रज-तमाच्या सततच्या हल्ल्यामुळे क्षीण होण्यास सुरुवात होते। त्यामुळे जिवाला स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होत नाही; म्हणून शक्यतो स्नानानंतर एका तासाच्या आत पूजा सुरू करावी.'खरे स्नान अ. न उदकक्लिन्नगात्रस्तु स्नात: इत्यभिधीयते । - महाभारत, १३.१११.९अर्थ : (केवळ) शरिराचे अवयव पाण्याने भिजले म्हणजे त्याला `स्नान केलेला' म्हणत नाहीत। ज्याने इंद्रियनिग्रहरूपी जलाने स्नान केले, तो अंतर्बाह्य शुद्ध होय. आ....
पूजेपूर्वी करावयाची वैयक्तिक तयारी ( केशरचना / केशरचना / अलंकारधारण )
टिळाधारण पुरुषाने स्वत:ला किंवा अन्य पुरुषाला टिळा लावणे :- अ. कुंकू : मध्यमेने आज्ञाचक्रावर उभे लावावे.आ. गंध : अनामिकेने आज्ञाचक्रावर लावावे.इ. शेंदूर : अनामिकेने नाकाच्या मुळाशी लावावा.ई. बुक्का : अनामिकेने नाकाच्या मुळाशी लावावा.उ. अक्षता : कुंकू / गंध यांवर पाचही बोटांचा वापर करून अक्षता लावाव्यात.ऊ. भस्म : हाताच्या मधल्या तीन बोटांनी भस्म लावतांना वरून खालच्या भागाकडे म्हणजे सर्वप्रथम कपाळावर व त्यानंतर विशुद्ध, अनाहत व मणिपूर या चक्रांवर एकानंतर...
पूजेपूर्वी करावयाची वैयक्तिक तयारी (वस्त्रधारण)
पुरुषांनी वापरावयाची वस्त्रेअ. सोवळे-उपरणे : शर्ट-पँटऐवजी गडद रंगाचे (शक्यतो लाल रंगाचे) सोवळे, पितांबर किंवा धूतवस्त्र परिधान करून डाव्या खांद्यावर उपरणे घ्यावे. उपरणे खांद्यावर घेतांना घडी पुढे, दशा मागच्या बाजूला व काठाची बाजू बाहेरच्या बाजूला यायला हवी. सोवळे-उपरणे परिधान करणे शक्य नसल्यास सदरा-पायजमा परिधान करावा.आ. टोपी : शेंडी न ठेवणार्या पुरुषांनी डोक्यावर प्रचलित असलेली चपटी व दोन्हीकडून टोकदार असलेली टोपी घालावी. टोपी गडद रंगाची (शक्यतो...
पूजेपूर्वी करावयाची वैयक्तिक तयारी (वस्त्र)
वस्त्रधारण १. वस्त्र कोणते वापरावे ?सत्यनारायणाची पूजा, वास्तूशांती यांसारख्या धार्मिक विधींच्या प्रसंगी धुतलेले नवीन वस्त्र वापरावे. दररोजच्या पूजेसाठी नवीन वस्त्र वापरणे शक्य नसते; म्हणून अशा वेळी धुतलेले वापरलेले वस्त्र वापरावे. रेशमी वस्त्र वापरणे शक्य नसल्यास सुती वस्त्र वापरावे.२. वस्त्र कोणते वापरू नये ? न धुतलेले (मलीन), जळलेले, फाटके व पॉलिएस्टर, नायलॉन, रेयॉन यांसारख्या कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले वस्त्र वापरू नये. वाचा : अंघोळीपूर्वी...
Subscribe to:
Posts (Atom)