स्नान१. शक्य असल्यास नदी, तलाव, विहीर आदी जलस्रोतांच्या ठिकाणी स्नान करावे. २. रासायनिक घटकांपासून बनवलेल्या साबणाने स्नान करण्यापेक्षा तेल व उटणे लावून किंवा आयुर्वेदिक साबण लावून स्नान करावे.३. स्नानापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करावी, `हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे बाह्य शरीर शुद्ध होण्याबरोबरच अंतर्मनही स्वच्छ व निर्मळ होऊ दे.'४. घरी स्नान करायचे झाल्यास पाटावर मांडी घालून व शक्यतो डोक्यावरून स्नान करावे.५. स्नान करतांना आपल्या उपास्यदेवतेचा...
Guru Pournima 2013r
Chattrapati Shivaji Maharaj...
Swatantryaveer Vinayak Savarkar
Adi Shankaracharya
Guru Pournima 2013
Read More About Guru Pournima ...More
Chattrapati Shivaji Maharaj
Hindavi swarajyache sansthapak ani adarsh rajyakarta...More
Swantraveer Vinayak Damodar Sawarkar
Swatantryaveer vinayak damodar savarkarancha vijay aso...More
Adi Shankaracharya
Adi Shankkaracharya...More
मुलांनो, `सुसंस्कारीत व्हा !
नीतीमूल्ये, संस्कृती, परंपरा व आचारधर्म या गोष्टी बाल्यावस्थेतच व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टीकोन घडवतात ! १. लेखअ. भावी पिढीला संदेश !आ. सगळयात मोठा संस्कार हिंदुत्वाचा !२. बालमित्रांसाठी प्रश्नोत्तरेअ. जोड्या जुळवा ! आ. रिकाम्या जागा भरा ! इ. रिकाम्या जागा भरा ! ई. योग्य व अयोग्य कृती कोणत्या, ते ओळखा ! उ. एका शब्दात उत्तरे द्या ! ऊ. चित्रावरून प्रश्नांची उत्तरे द्या !३. मुलांनो, `सुसंस्कारीत व्हा !' अ. `सुसंस्कारीत व्हा !' आ. विद्यार्थ्यांनो,...
देवपूजेसाठी करावयाच्या तयारीचा क्रम कसा असावा ?
`देवपूजेची तयारी करतांना पुढीलप्रमाणे करावी.अ. पूजकाची (जिवाची) तयारीआ. स्थळाची शुद्धीइ. उपकरणांची शुद्धी व जागृतीई. पूजेपूर्वी करावयाची अन्य तयारी, उदा. निर्माल्यविसर्जन, देशकाल उच्चार, संकल्प, देवतांच्या मूर्ती व चित्रे स्वच्छ करणे.देवपूजेसाठी करावयाच्या तयारीचा विशिष्ट क्रम असण्याचे कारण :अशा प्रकारची पूजेची तयारी जिवाच्या बाह्यतेतून अंतरात्मकतेकडील प्रवास दर्शवते. त्यामुळे जिवाची वृत्ती जास्त प्रमाणात अंतर्मुख होऊन जीवस्थळ व काळ यांच्यातील सगुणाला...
अहेर करणे
अहेर' या शब्दाचा अर्थ `अहेर' म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट। अहेर कसा असावा ?`हल्ली मोठमोठ्या किमती वस्तू भेट म्हणून देणे, यालाच अहेर समजतात; पण खरे पहाता हे भावनेपोटी केलेले कर्म आहे. अहेर हा दुसर्या जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा, असा असावा. ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, देवतांप्रती भक्तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे व नामपट्ट्या, ही अशा प्रकारच्या अहेरची काही उदाहरणे होत. संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे...
कोणाला नमस्कार करू नये ?
खाली उल्लेख केलेल्या व्यक्तींना का नमस्कार करू नये, यामागील शास्त्र येथे विशद केले आहे. १. समुद्रात उतरलेली व्यक्ती : समुद्रात उतरलेल्या व्यक्तीला धोका असतो. तिला नमस्कार केल्याने आपल्यालाही धोका संभवू शकतो.२. उद्विग्न व्यक्ती : उद्विग्न व्यक्तीला नमस्कार केल्याने आपले मन विचलित होऊन आपल्यातही उद्विग्नता निर्माण होऊ शकते. तसेच उद्विग्न व्यक्तीला नमस्कार करण्याचा आदर्श ठेवणेही चुकीचे आहे.३. ओझे वाहणारी व्यक्ती : ओझे वाहणार्या व्यक्तीतील रजोगुण वाढलेला असतो. तसेच अशा व्यक्तीला नमस्कार करणे, म्हणजे तिच्यासारखा (अनावश्यक) ओझे वाहण्याचा आदर्श समोर ठेवणे.४. स्त्रीसह क्रीडेत आसक्त असलेली व्यक्ती...
यज्ञ करणार्या व्यक्तीला नमस्कार करू नये ?
१. यज्ञ करणारी व्यक्ती ही बहुतेक वेळा स्वत:ला विशिष्ट फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ करत असते. तिला नमस्कार केल्याने तिला मिळणार्या फळामधील काही भाग नमस्कार करणार्याला मिळतो. त्यामुळे यज्ञ करणार्या व्यक्तीला यज्ञाचा पूर्ण फायदा होत नाही.२. यज्ञ करणार्या व्यक्तीची कुंडलिनीशक्ती जागृत झालेली असते. तिला नमस्कार केल्याने तिची एकाग्रता भंग होऊन तिच्या साधनेत खंड पडण्याचा संभव असतो.३. यज्ञ करणार्या व्यक्तीला नमस्कार केल्याने तिचा अहं वाढून भाव कमी होऊ शकतो.४. नमस्कार करणार्याची पात्रता कमी असल्यास त्याला नमस्कारातून मिळणारी शक्ती सहन न झाल्याने त्या शक्तीचा त्रास होऊ शकतो.संदर्भ : सनातन-निर्मित...
नमस्कार करतांना पुरुषांनी डोके झाकू नयेत; मात्र स्त्रियांनी डोके का झाकावेत ?
न सोपानद्वेष्टितशिरा अवहितपाणिर्वाभिवादयीत । - आपस्तम्ब धर्मसूत्र १/४/१४/१९ अर्थ : पादत्राणे घालून, डोके झाकून किंवा हातात काही घेऊन नमस्कार करू नये।(स्त्रियांनी मात्र डोक्यावर पदर घेऊनच नमस्कार करावा.)`नमस्कार करतांना हात टेकवलेल्या स्थानावरील कुंडलिनीतील चक्र जागृत झालेले असते. त्यामुळे शरीरात सात्त्विकता जास्त प्रमाणात प्रवेश करू शकते. काही वेळा कुंडलिनीच्या जागृतीमुळे डोक्याच्या माध्यमातूनही सत्त्वलहरी शरिरात येऊ लागतात; परंतु काही वेळा वाईट...
नमस्कार करतांना कोणतीही वस्तू हातात का धरू नये ?
१. नमस्कार करतांना हातामध्ये एखादी वस्तू असल्यास हाताची बोटे व बोटांची टोके सरळ रेषेत न रहाता दुमडलेल्या स्थितीत रहातात. त्यामुळे समोरून येणार्या सत्त्वलहरींना दुमडलेल्या बोटांमधून व बोटांच्या टोकांमधून प्रवेश करता येत नाही.२. समोरून येणार्या सत्त्वलहरी हातामध्ये धरलेल्या वस्तूवर धडकून पुन्हा मागे परत जातात। तसेच काही वेळा ती वस्तूही सत्त्वलहरी स्वत:मध्ये शोषून घेऊ शकते.३. हातात धरलेली वस्तू जर राजसिक किंवा तामसिक असेल, तर अशी वस्तु नमस्कार करतेवेळी कपाळाला किंवा छातीला लावल्यास तिच्यातून प्रक्षेपित होणार्या रज-तम लहरी शरिरात प्रवेश करतात.'संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?'...
वटपौर्णिमा
* घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून मिळणारा लाभ मिळतो का ? * वडाच्या पूजनाच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्ये * वटपौर्णिमेचे अशा प्रकारचे हे व्रत काशीला जाऊन आल्यानंतर करायचे असते, असे सांगितले जाते। ज्या घरातील स्त्रीने असे व्रत सुरू केले असेल, ती स्त्री पतीनिधनानंतर आपले हे व्रत घरातील मोठ्या सुनेला करावयास देते। यामागील उद्देश काय ? या प्रश्नांची उत्तर येथे वाचा : वटपौर्णिमा--------------------------------------------------------------------------------...
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन
* प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज ! * छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला... * महाराष्ट्रातील लष्करी परंपरेचे आद्य प्रवर्तक : छत्रपति श्री शिवराय * छ. शिवरायांचे राज्य निधर्मी नव्हे, तर धर्मराज्यच होते ! * शिवचरित्र : हिंदूंसाठी अखंड स्फूर्तीचा झरा ! * छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज:पुंज तत्त्व * छत्रपती शिवाजी महाराज जन्मतिथी वाद * म्हणे मुसलमान `स्वराज्यनिष्ठ' ! * म्हणे शिवाजी महाराजांसाठी प्राणार्पण करणारे बहुसंख्य लोक मुसलमान होते ! * शिवरायांना...
स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र काय ?
* स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र काय ?* टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का आहे ? * कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्टकरण्याची प्रचंड क्षमता निर्माण होणे !`कुंकवामध्ये तारक व मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे। स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्टकरण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते। देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या...
आपल्या महान यज्ञसंस्कृतीचे फायदे
शारीरिकदृष्ट्या : यज्ञोपचाराने क्षय ,पटकी ,विषमज्वर ,देवी इत्यादी रोग बरे होतात.मानसिकदृष्ठ्या : अगीहोत्राने तणाव ,व्यसनाधीनता ,घरातील अशांती आदी समस्या दूर होतात.पर्यावरणदृष्ट्या : अगीहोत्राने प्रदूषणनची समस्या कमी होते व पर्जनयागामुळे पावसाचे प्रमाण वाढते.आध्यात्मिकदृष्ट्या : यज्ञयाग केल्याने दैवी शक्ती आकृष्ट होऊन सर्वसाधारणत: १० कि.मी. पर्यन्तचे वातावरण सात्विक राहते...
स्नान करण्याची योग्य पध्दत
पहाटे शक्य नसल्या सूर्योदयानंतर स्नान करावे रासायनिक घटकांपासून बनवलेल्या साबणाने स्नान करण्यापेक्षा सुगंधी तेल व उटणे लावून किंवा आयुर्वेदिक साबणाने स्नान करावे .आंघोळीच्या पाण्यात चमचाभर जाडे मिठ घालावे व उपास्यदेवतेला प्राथेना करावी ,`माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती मिठामध्ये शोषून घेतली जाऊन मी शुध्द होऊ दे .'स्नानाला सुरुवात करण्यापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करावी ,`हे,जलदेवते ,तुझ्या पवित्र जलाने माझे बाह्य शरीर शुध्द होण्याबरोबरच अंतर्मनही शुध्द व निर्मळ होऊ दे .'स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नानाला सुरुवात करावी .स्नान करतांना पाटावर मांडी घालून बसावे व शक्यतो डोक्यावरुन स्नान करावे...
नमस्कार करतांना पादत्राणे का घालू नयेत ?
सोपानत्कश्चाशनासनशयनाभिवादननमस्कारन वर्जयत् । - गौतमस्मृति ९अर्थ : बसणे, भोजन करणे, झोपणे, गुरुजनांना अभिवादन करणे व (अन्य श्रेष्ठ व्यक्तींना) नमस्कार करणे, ही सर्व कार्ये पादत्राणे घालून करू नयेत। १. `एखादी व्यक्ती जेव्हा पादत्राणे घालते, तेव्हा त्या व्यक्तीमधील रज-तम वाढते.२. रज-तम वाढलेल्या स्थितीत ती व्यक्ती जेव्हा नमस्कार करण्यासाठी हात जोडते, तेव्हा तिच्या कुंडलिनीतील कोणतेही चक्र जागृत होत नाही.३. रज-तम वाढल्याने त्या व्यक्तीची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे तिला नमस्काराचे फळ प्राप्त होत नाही.४. पादत्राणे घालून देवतांना नमस्कार केल्याने देवता रागावण्याचाही...
असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ति देणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट
१. राणी लक्ष्मीबाई
२. असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ति देणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
३. झांशीवाली४ . मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसकडून सोनिया गांधी राणी लक्ष्मीबाईंच्या देवता व राष्१२ यांना राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात दाखवून केलेले विडंबन रूपात
ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले। त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई...
नमस्कार करतांना डोळे का मिटावेत ?
`दोन्ही हात जोडून नतमस्तक होणे, म्हणजे ईश्वराला किंवा समोरच्या व्यक्तीतील देवत्वाला प्रणाम करणे होय। आपल्याच अंतर्यामी ईश्वराचे दर्शन व्हावे, यासाठी ईश्वराला किंवा आदरणीय व्यक्तीला वंदन करतांना डोळे मिटावेत.'संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्ध...
मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?
कलीयुगात कर्मकांडानुसार `मृतदेहाला चांगली गती प्राप्त होऊ दे', अशी ईश्वराला प्रार्थना करून मृतदेहाला नमस्कार करण्याची प्रथा आहे. मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ? उत्तर : - असे करण्याने कलीयुगातील जिवांसमोर प्रत्यक्ष कृतीतून `थोरामोठ्यांचा आदर राखावा', असा आदर्श निर्माण करणे अशक्य होईल. कलीयुगातील पिढी जी धर्मभ्रष्ट होत चालली आहे, त्या पिढीला प्रत्यक्ष आदर्श वर्तनाच्या निम्न स्तराला येऊन शिकवणेच क्रमप्राप्त आहे. कलीयुगातील जीव हे आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट त्या त्या स्थळी जाऊन, तिथे नमस्कारासारखी प्रत्यक्ष कृती करून शिकवणे...
मृतदेहाला नमस्कार करावा का ?
त्रेता व द्वापार या युगांतील जीव हे कलियुगातील जिवांच्या तुलनेत खूपच सात्त्विक असल्याने त्यांच्या मृतदेहाला नमस्कार करणे योग्य असले, तरी कलियुगात तसे करणे केवळ रूढीमुळे चालू आहे का ? तसे असल्यास ती रूढी बंद करावी का ?उत्तर : मृतदेहाला नमस्कार करण्याने त्याच्याबद्दल आदराची भावना व्यक्त करून इतरांसमोर वरिष्ठांचा मान राखावा, हा आदर्श ठेवता येतो. कलियुगात या प्रक्रियेतून आध्यात्मिक स्तरावरील फायदा न मिळता फक्त भावनिक स्वरूपाचाच फायदा मिळणे शक्य होते म्हणून ही रूढी बंद करू नये, तर त्यातून आध्यात्मिक फायदा कसा मिळवावा, हे शिकावे. जिवाची सात्त्विकता कमी झाल्याने कलियुगात या प्रक्रियेला रूढीचेच स्वरूप...
एकमेकांना भेटतांना कशा प्रकारे नमस्कार करावा ?
वाचा : Why 'Namaskar' and not a 'hand shake'?परस्परांना भेटतांना एकमेकांसमोर उभे राहून दोन्ही हातांची बोटे जुळवून अंगठ्यांची टोके स्वत:च्या अनाहतचक्राशी टेकवून नमस्कार करावा. असा नमस्कार केल्याने जिवात नम्रभावाचे संवर्धन होऊन ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी जिवाच्या चार बोटांतून संक्रमित होऊन अंगठ्यातून शरिरात गेल्यामुळे जिवाचे अनाहतचक्र जागृत होते. यामुळे जिवाची आत्मशक्ती कार्यरत होते. तसेच परस्परांना नमस्कार केल्याने एकमेकांकडे आशीर्वादात्मक लहरींचे...
सौभाग्यवतीने ज्येष्ठांना नमस्कार करतांना तीन वेळा हात खाली-वर का करावा ?
सौभाग्यवती स्त्री ही आदिमायेच्या अप्रकट निर्गुण स्तरावरील सुप्त शक्तीचे द्योतक आहे। ती मायेतूनही अद्वैत साधून देणारे आदिशक्तीचे सगुण रूप आहे. ज्या वेळी आपण कुठल्याही गोष्टीचा त्रिवार उच्चार करतो किंवा एखादी गोष्ट त्रिवार करतो, त्या वेळी ईश्वराची संकल्पशक्ती इच्छा, क्रिया व ज्ञान या तीन शक्तींच्या स्तरांवर कार्यरत होते. यामुळे आपण हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाते. सुवासिनी स्त्रीमध्ये आदिमाया-आदिशक्तीचे बीज हे सुप्तावस्थेत असल्याने तिच्या खाली वाकून त्रिवार हात हालवण्याने उत्पन्न होणार्या शक्तीरूपी रजोलहरींच्या वेगवान प्रक्षेपणामुळे, तसेच तिच्यातून प्रकट होणार्या लीनभावामुळे समोरील...
औक्षण करतांना नाण्याऐवजी दागिन्याने ओवाळण्यामागील शास्त्र काय ?
`सोन्याचे किंवा चांदीचे नाणे किंवा या धातूंची पट्टी वापरल्याने, त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा स्तर जास्त प्रमाणात सपाट पृष्ठभाग असल्याने सत्त्वगुणाशी, म्हणजेच निर्गुणाशी संबंधित असतो. याउलट त्या धातूंचे दागिने वापरले असता, त्यांवर असलेल्या नक्षीमुळे त्या त्या घटकाची सगुणाशी संबंधित रजोगुणी लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता वाढते व या लहरी सत्त्वगुणी लहरींपेक्षा कनिष्ठ स्तरावरील असल्याने सर्वसामान्य जिवाला सहज ग्रहण होऊन त्या त्या स्तरावर त्या त्या लहरींचा फायदा मिळणे सुलभ होते; म्हणून शक्यतो औक्षणात दागिने वापरले जातात.संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील...
औक्षण करतांना अंगठी (दागिना) व सुपारी हातात घेऊन त्यांनी का ओवाळतात ?
`अंगठी व सुपारी या दोन्ही गोष्टी जिवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक, म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तबकातील सर्वच घटक देवतांकडून येणार्या सात्त्विक लहरींनी भारित झालेले असतात. सोन्याची अंगठी ही सत्त्वगुणप्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरी या सुपारीतून प्रक्षेपित होणार्या आपतत्त्वाच्या लहरींमुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी, म्हणजेच प्रवाही बनतात. यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणार्या लहरींचे रूपांतर जिवाला पेलवेल, अशा सगुण लहरींत होणे सोपे जाते. यामुळे जिवाला त्याच्या क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास मदत होते.'संदर्भ : सनातनच्या...
पती व पत्नी यांनी जोडीने नमस्कार करतांना पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूस राहून नमस्कार करावा ?
कोणतेही कर्म करतांना पत्नीने पतीच्या उजव्या बाजूस रहावे। पत्नीला नवर्याची अर्धांगी म्हणजेच उजवी नाडी समजतात. उजवी नाडी ही कार्याला ऊर्जा पुरवणार्या आदिशक्तीच्या प्रकट कार्यरत शक्तीचे प्रतीक आहे, तर पुरुषतत्त्वाचे निदर्शक असणारी डावी नाडी ही आदिशक्तीने पुरवलेल्या कार्यऊर्जेच्या बळावर प्रत्यक्ष कार्य करणार्या शिवाचे प्रतीक आहे. शिवाची शक्ती म्हणून पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला राहून त्याला प्रत्येक कर्मात साथ द्यावयाची असते. प्रत्येक पूजाविधीमध्ये प्रत्यक्ष कर्म न करता पत्नी फक्त पतीच्या उजव्या हाताला आपल्या चार बोटांचा स्पर्श करून त्याला पूजाविधीमध्ये लागणारी श्री दुर्गादेवीची क्रियाशक्ती...
विवाहानंतर पती व पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?
`विवाह म्हणजे शिवरूपी पती व शक्तीरूपी पत्नी या तत्त्वांचा संगम होय। प्रत्येक कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्ती (प्रत्यक्ष कार्य करणे) व त्या कर्माला गती प्राप्त करून देणारी, तसेच जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुणाशी संबंधित असणारी शक्ती यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारसागरातील कर्मे करणे व त्यासाठी थोरामोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी एकत्रितपणे नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्तीरूपी लहरी कार्यरत होऊन जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडून...
वयोवृद्धांना नेहमी नमस्कार का करावा ?
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यून: स्थविर आयति । प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ।। - मनुस्मृति २.१२०; महाभारत, उद्योग. ३८.१, अनु. १०४, ६४-६५.अर्थ : वृद्ध पुरुषाचे आगमन झाल्यावर तरुण व्यक्तीचे प्राण वरच्या दिशेने सरकू लागतात व जेव्हा तो उठून नमस्कार करतो, तेव्हा...
Subscribe to:
Posts (Atom)